शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Citizen Amendment Bill: नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यावरुन जेडीयूत पडली फूट? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 10:13 IST

Citizen Amendment Bill : दरम्यान, जेडीयू प्रवक्ते पवनकुमार वर्मा यांनीही या विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं सांगितले आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिल्यामुळे जेडीयूत पक्षातंर्गत नाराजी नितीश कुमार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, पक्षातील नेत्यांची मागणी राज्यसभेत जेडीयू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. मात्र लोकसभेत जेडीयू खासदारांनी केंद्र सरकारने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याने पक्षातील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने जेडीयूने मतदान केले होते. 

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरुवातीला पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी ट्विट करुन जेडीयूने या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय संविधानाला धरुन नाही असं म्हटलं होतं. त्यांच्यानंतर पवन वर्मा यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. आता राज्यसभेचे माजी खासदार गुलाम रसूल बलियावी यांनी नितीश कुमार यांना पत्र लिहून विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

या पत्रात गुलाम रसूल बलियावी यांनी लिहिलंय की, नितीश कुमार यांची प्रतिमा नेहमी अशी राहिली आहे जी चुकीचं असेल तर चूक आहे असं स्पष्ट शब्दात सांगणारी आहे. रामजन्मभूमी विवाद, तीन तलाक आणि कलम ३७० असो वा एनआरसी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. संविधानविरोधी प्रस्ताव नाकारणे, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या हक्काचे संरक्षण करण्याचे समर्थन जेडीयूने केलं आहे. मात्र नितीश कुमार यांनी लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लीम समाजाता अस्वस्थता आहे. त्यामुळे जेडीयूने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

दरम्यान, जेडीयू प्रवक्ते पवनकुमार वर्मा यांनीही या विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं सांगितले आहे. राज्यसभेत हे विधेयक येईल तेव्हा या विधेयकाला पाठिंब्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा. हे विधेयक असंविधानिक आहे, देशाच्या एकतेला बाधा देणारे आहे. जेडीयू पक्षाच्या मूळ विचारधारेशी विभिन्न आहे. असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकार आणणार आहे. यावेळी जेडीयू नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक