शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

देशभरातील खासगी क्षेत्रातही नोक-यांमध्ये मिळालं पाहिजे आरक्षण, नीतीश कुमार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:26 IST

पाटणा- बिहारमध्ये बाहेरून करण्यात येणा-या भरतीसाठी आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता नीतीश कुमार यांनी खासगी क्षेत्रातही आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पाटणा- बिहारमध्ये बाहेरून करण्यात येणा-या भरतीसाठी आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता नीतीश कुमार यांनी खासगी क्षेत्रातही आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. मला वाटतं खासगी क्षेत्रातही नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे, राष्ट्रीय स्तरावर याची चर्चा करणं गरजेचं असल्याचं मतही नितीश कुमार यांनी मांडलं आहे.विशेष म्हणजे बिहार सरकारनं कंत्राटी पद्धतीच्या कर्मचा-यांसाठीही आरक्षणाचा नियम लागू केला आहे. त्यामुळे ज्या खासगी कंपन्या सरकारच्या विभागांना कंत्राटी कर्मचारी पुरवतात, त्यांनाही आरक्षणाच्या या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये आरक्षण अॅक्टनुसार बाहेरून करण्यात येणा-या भरतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरून भरती करण्यात येणा-या नोकरदारांना यात आरक्षण मिळणार आहे. कारण या कर्मचा-यांकडूनही सरकारला कररूपी पैसा मिळतो. त्यामुळे सरकारचा हा नियम यांनाही लागू असेल. तसेच या नियमाचं कंपन्यांनाही पालन करावं लागणार आहे.ज्या कंपन्या बाहेरून कंत्राटी पद्धतीनं सरकारी विभागांना माणसे पुरवतात, त्यांनाही हा नियम लागू असेल. परंतु सरकारी विभागांत बाहेरून कर्मचारी घेऊ नयेत, असं नितीश कुमार यांचं म्हणणं आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या विभागाकडून कंत्राटी कामगारांची मागणी होत असते. नितीश म्हणाले, बाहेरून भरण्यात येणा-या कंत्राटी कर्मचा-यांना आरक्षणाचा नियम लागू न केल्यास कंत्राटी कर्मचा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मग आरक्षणाच्या निर्णयाचा फायदा काय ?, ज्यांना आरक्षणाबाबत पुरेशी माहिती नाही, तेच लोक यावर प्रश्न उपस्थित करतात. खासगी कंपन्यांही सरकारसोबत काम करतात. त्या कंपन्यांवर याचा कोणताही प्रभाव पडणार नाही. कंत्राटी कर्मचारी संघटना बनवून वारंवार सेवेत कायमचं रुजू करून घ्यावं, अशी मागणी करतात. त्यामुळे हा नियम लागू केल्यास कंत्राटी कर्मचारी संघटनांना सेवेत कायम करण्याची मागणी करता येणार नाही.गुजरातमध्ये पाटीदार समाज आजही आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. नितीश कुमारांच्या या मागणीला भाजपाचे खासदार हुकूमदेव नारायण यांनीही समर्थन दिलं आहे. नारायण म्हणाले, हा मुद्दा उपस्थित केल्याबाबत मी नितीश कुमारांचे आभार मानतो. नितीश कुमारांची मागणी योग्य आहे. राष्ट्रीय स्तरावर याचा विचार व्हायला हवा. नितीश कुमार सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाहेरून भरती होणा-या कंत्राटी कर्मचा-यांना आरक्षण लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. अशा प्रकारे कंत्राटी कर्मचा-यांना आरक्षण लागू करणारं बिहार हे पहिलं राज्य ठरणार आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारreservationआरक्षण