शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:31 IST

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्याराजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. एकीकडे बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूच्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त नितीश कुमार यांनी व्हाईट बोर्डवर आपल्या हातांनी शुभेच्छा लिहिल्या. नितीश कुमार यांनी आधी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी खास व्हाईट बोर्डवरून शुभेच्छा दिल्याने त्यातून त्यांनी सुचक संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions)

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा मोदीविरोधी गटाशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितिश कुमार यांनी या शुभेच्छा दिल्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना नितीश कुमार यांनी पाटणामधील एका कार्यक्रमात एका व्हाईट पेंटिंगमध्ये रंगकाम केले होते. त्यामधील कमळ त्यांनी रंगवले होते. त्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा हातमिळवणी करत राज्यात एनडीएचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, आजच्या संदेशामधून नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपासोबत चांगले संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची सुरुवात काही दिवसांआधीच केली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीयू सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हरियाणामध्ये चौधरी देविलाल यांच्या जयंतीला निमंत्रण असूनही उपस्थित राहणे टाळले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या शुभेच्छा संदेशावर राजदने खोचक टीका केली आहे. नितीश कुमार हे गुजरातमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. तिथे भाजपाने सर्व सरकारच बदलले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाशी आणि मोदींशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे, असा टोला राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारPoliticsराजकारण