शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

नितीश कुमार यांनी मोदींसाठी व्हाईट बोर्डवर लिहिला खास संदेश, चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:31 IST

Nitish Kumar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्या राजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत.

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आज देशातील राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होता. दरम्यान, मोदींच्या जन्मदिनी एक फोटो खूप चर्चेत राहिला. या फोटोचे बिहारच्याराजकारणामध्ये राजकीय अर्थ शोधले जात आहेत. एकीकडे बिहारमध्ये भाजपा आणि जेडीयूच्या संबंधांबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त नितीश कुमार यांनी व्हाईट बोर्डवर आपल्या हातांनी शुभेच्छा लिहिल्या. नितीश कुमार यांनी आधी ट्विट करून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी खास व्हाईट बोर्डवरून शुभेच्छा दिल्याने त्यातून त्यांनी सुचक संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (Nitish Kumar wrote a special message for Modi on the White Board, sparking discussions)

गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून भाजपा आणि जेडीयूमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच नितीश कुमार पुन्हा एकदा मोदीविरोधी गटाशी हातमिळवणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नितिश कुमार यांनी या शुभेच्छा दिल्याने या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. 

२०१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना नितीश कुमार यांनी पाटणामधील एका कार्यक्रमात एका व्हाईट पेंटिंगमध्ये रंगकाम केले होते. त्यामधील कमळ त्यांनी रंगवले होते. त्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच नितीश कुमार यांनी भाजपासोबत पुन्हा हातमिळवणी करत राज्यात एनडीएचे सरकार स्थापन केले होते. दरम्यान, आजच्या संदेशामधून नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपासोबत चांगले संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.

नितीश कुमार यांनी मोदी आणि भाजपाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची सुरुवात काही दिवसांआधीच केली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीयू सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हरियाणामध्ये चौधरी देविलाल यांच्या जयंतीला निमंत्रण असूनही उपस्थित राहणे टाळले होते.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या या शुभेच्छा संदेशावर राजदने खोचक टीका केली आहे. नितीश कुमार हे गुजरातमधील परिस्थिती पाहून घाबरले आहेत. तिथे भाजपाने सर्व सरकारच बदलले आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाशी आणि मोदींशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे, असा टोला राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारPoliticsराजकारण