शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

नितीशकुमार आता बस झाले, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करा; भाजप नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:40 IST

जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : सुरूवातीला काँग्रेस, राजदच्या आघाडीतून सत्ता मिळविणाऱ्या नितीशकुमार यांनी काही वर्षांतच भाजपशी सलगी करून पुन्हा सत्ता स्थापन केली होती. मात्र, बिहारमध्ये पुन्हा राजकारण तापत असून भाजपाच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना आता लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपचे नेते संजय पासवान यांनी नितीशकुमार यांच्याबाबत वक्तव्य केले. गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. आता बस झाले, त्यांनी मुख्यमंत्रपद सोडायला हवे आणि केंद्रात जबाबदारी स्वीकारायला हवी. पुढील मुख्यमंत्रीपद भाजपाला मिळायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. 

जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे. पासवान यांच्या वक्तव्यावर जदयूच्या नेत्यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. वरिष्ठ नेते रजक यांनी म्हटले की, बिहारमध्ये येऊन काही नेते फालतू वक्तव्ये करत सुटतात. पंतप्रधान मोदी यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली आहे. पुढील निवडणुकही नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. 

भाजप-जदयूच्या या वाक्युद्धात लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यानेही उडी घेतली आहे. भाजपाच्या नेत्यांच्या वक्तव्याचे खंडण करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का? मोदींच्या नावावर जाहीरनामा बनवत भाजपचाच वापर करून 16 खासदार निवडून आणले? प्रत्येक विधेयकावर ते भाजपाचे समर्थन करतात? मग ते वेगळे कसे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड