शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

नितीशकुमार आता बस झाले, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करा; भाजप नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 08:40 IST

जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : सुरूवातीला काँग्रेस, राजदच्या आघाडीतून सत्ता मिळविणाऱ्या नितीशकुमार यांनी काही वर्षांतच भाजपशी सलगी करून पुन्हा सत्ता स्थापन केली होती. मात्र, बिहारमध्ये पुन्हा राजकारण तापत असून भाजपाच्या नेत्यांनी नितीशकुमार यांना आता लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपचे नेते संजय पासवान यांनी नितीशकुमार यांच्याबाबत वक्तव्य केले. गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. आता बस झाले, त्यांनी मुख्यमंत्रपद सोडायला हवे आणि केंद्रात जबाबदारी स्वीकारायला हवी. पुढील मुख्यमंत्रीपद भाजपाला मिळायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. 

जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे. पासवान यांच्या वक्तव्यावर जदयूच्या नेत्यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. वरिष्ठ नेते रजक यांनी म्हटले की, बिहारमध्ये येऊन काही नेते फालतू वक्तव्ये करत सुटतात. पंतप्रधान मोदी यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली आहे. पुढील निवडणुकही नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल. 

भाजप-जदयूच्या या वाक्युद्धात लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यानेही उडी घेतली आहे. भाजपाच्या नेत्यांच्या वक्तव्याचे खंडण करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का? मोदींच्या नावावर जाहीरनामा बनवत भाजपचाच वापर करून 16 खासदार निवडून आणले? प्रत्येक विधेयकावर ते भाजपाचे समर्थन करतात? मग ते वेगळे कसे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड