शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बिहारमध्ये पुन्हा NDA'चे सरकार! नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, नवव्यांदा CM बनले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:19 IST

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तेत आले आहे.

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेतून बाहेर पडले आहे. सकाळीच नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यावेळी भाजप समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.

'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

दरम्यान, आज सकाळपासूनच बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सकाळीच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयू आणि भाजपचे प्रत्येकी तीन मंत्री, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चातील एक आणि एका अपक्ष आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चिराग पासवानही राजभवनात उपस्थित होते.

९ मंत्र्यांनी घेतली शपथ 

राज्यपालांनी नितीश कुमार यांच्यासह ९ जणांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्रीपद मिळालेल्या दोन चेहऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे. नितीश कुमार यांच्यानंतर सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. याशिवाय विजय चौधरी, श्रवण कुमार, डॉ.प्रेम कुमार, संतोष कुमार सुमन, विजेंद्र यादव, सुमित सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एलजेपी राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान, पशुपती पारस, उपेंद्र कुशवाह, जीतन राम मांझी यांच्यासह एनडीए घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.

२४ वर्षांच्या या राजकीय प्रवासात नितीश कुमार यांनी आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आज नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनण्याची नववी वेळ होती. बिहारचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी नितीश कुमार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते.राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात'

बिहारमध्ये तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर सरकार पडले. आता नितीश कुमार आज संध्याकाळी पुन्हा एकदा एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.

रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, माझ्या पक्षाचं मत लक्षात घेतल्यानंतर मी राजीनामा दिला. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते (आरजेडी) घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं, दोन्ही बाजूंनी त्रास होता.

राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्हा सर्वांना सांगत आहे की आज आम्ही राजीनामा दिला आहे. सर्व काही नीट होत नसल्याने राजीनामा देण्याची वेळ आली. आम्ही काहीही बोलणं बंद केलं होतं, सर्वांची मत येत होती, पक्षाच्या मताचा सर्व बाजूंनी विचार झाला, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBiharबिहार