शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर नितीश कुमारांना पहिला झटका, वरिष्ठ नेत्याने दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:48 IST

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला. याचे पडसाद आता पक्षात उमटण्यास सुरूवात झाली आहे.

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत गुरुवारी (३ एप्रिल) मंजूर झाले. हे विधेयक आता राज्यसभेत आहे. या विधेयकाला एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने पाठिंबा दिला आहे. पक्षाने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मोहम्मद कासिम अन्सारी यांनी राजीनामा दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपने वक्फ सुधारणा विधेयक आणल्यानंतर नितीश कुमारांच्या जदयूची भूमिका काय असेल, अशी चर्चा होती. अखेर काही मागण्या जदयू आणि टीडीपीने केल्या होत्या. त्या मान्य झाल्यानंतर दोन्ही पक्षानी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आणि लोकसभेत त्या बाजूने मतदान केलं आहे. 

वाचा >>वक्फ विधेयकाबाबत पाकिस्तान, कतार ते युएईतील माध्यमांमध्ये काय?

जदयूच्या या निर्णयानंतर पक्षातील मुस्लीम आणि इतर काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जदयूमध्ये याची प्रतिक्रिया उमटली असून, पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. 

नितीश कुमारांकडे पाठवला राजीनामा

मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. अन्सारी जदयूचे अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बिहारमधील ढाका विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 

वक्फ दुरुस्ती विधेयकाला बुधवारी मध्यरात्री लोकसभेने १२ तासांच्या वादळी चर्चेनंतर मध्यरात्री १.५५ वाजता मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने २८८, तर विरोधात २३२ मते पडली. बुधवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री १२.०५ वाजेपर्यंत चालली.

विधेयकामुळे होणार हे बदल

वक्फ ट्रायब्युलनचा निर्णय अंतिम नसेल. त्या निर्णयाला दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल.

वक्फ ट्रायब्युलनच्या निर्णयाविरोधात २० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल.केवळ दान म्हणून मिळालेल्या जमिनीच वक्फच्या संपत्तीत समाविष्ट होतील.

वक्फच्या सर्व संपत्तीची नोंद एका पोर्टलवर केली जाणार आहे. सरकारी जमिनींवरील दाव्यांची चौकशी केली जाईल.

केवळ एखादी जागा नमाजासाठी वापरली जात आहे म्हणून तिथे वक्फचा दावा ग्राह्य धरला जाणार नाही.आदिवासी क्षेत्रातील जमिनींवर वक्फ बोर्ड आपला दावा करू शकणार नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडPoliticsराजकारणwaqf board amendment billवक्फ बोर्ड