शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांनी खंजीर खुपसला, अमित शहा यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:16 IST

२०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. पूर्णियात आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.  

एस. पी. सिन्हा

पूर्णिया : पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून राजद व काँग्रेसशी हातमिळवणी केली, अशी घणाघातील टीका  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे केली. नितीशकुमार यांच्याकडे कोणतीही विचारसरणी नाही. त्यामुळे जातीपातीच्या राजकारणासाठी त्यांनी समाजवादाला तिलांजली दिली, असा आरोप त्यांनी केला. नितीशजी २०१४ मध्येही तुम्ही हेच केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारची जनता ही महाआघाडी उखडून टाकेल. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. पूर्णियात आयोजित पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.  

नितीशकुमार पंतप्रधान बनू इच्छितात. त्यामुळे आमच्या पाठीत खंजीर खुपसून ते राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. माझी खुर्ची शाबूत राहावी एवढी  त्यांची एकच विचारसरणी आहे, असाही टोला त्यांनी लगावला. 

ते कधिही पंतप्रधान होऊ शकत नाहीतनितीशकुमार यांना लालुप्रसाद यादव यांच्यासोबत जाण्यासाठी बिहारी जनतेने मतदान केले नव्हते. मात्र, पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी जनादेश डावलला. पण, ते कधीही पंतप्रधान बनू शकत नाहीत, असे शहा म्हणाले. 

...‘ते’ तर धोकेबाजनितीशकुमार हे धोकेबाज आहेत.  त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना धोका दिला. शरद यादव यांच्यासोबतही त्यांनी हाच कित्ता गिरवला. त्यानंतर जीतन राम मांझी, रामविलास पासवान यांनाही धोका दिला. उद्या राजदलाही धोका देतील, असे शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमार