शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:13 IST

'आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता'

पटना : पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल, असा दावा करत जे लोक जेडीयू आणि सहकारी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची वाईट स्थिती होईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. 

भाजपा आणि जेडीयू यांच्यात कोणताही मतभेद नाहीत. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा मिळतील असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. जेडीयूच्या एका आयोजित बैठकीत नितीश कुमार बोलत होते. यावेळी नितीश कुमार म्हणाले, "असे अनेक लोक आहेत, त्यांना वाटते की आमच्या आघाडीमध्ये गडबड आहे. तर असे काही नसून जे गडबड करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचीच बिकट अवस्था होणार आहे."

याचबरोबर, नितीश कुमार यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की, त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. असाच सल्ला त्यांनी पार्टीच्या प्रवक्त्यांनाही दिला आहे. तसेच, ते म्हणाले," 2010 ची विधानसभा निवडणुक आठवण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी बहुमत मिळेल अशी आशा नव्हती. मात्र, आपण 243 जागांपैकी 206 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असा आत्मविश्वास बाळगा." 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार