शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 15:44 IST

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते.

पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून जागा वाटपावरून भाजपा आणि नितिशकुमार यांच्या जेडीयूमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादासारखी कोणतीही गोष्ट नसून सारे काही ठीक असल्याचे म्हटले आहे. 

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जुना जागा वाटपाचा फॉर्म्युला चालणार नाही. नवीन फॉर्म्युल्यानुसार जागांचे वाटप झाले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. भाजपासोबत यावेळी जागांचे वाटप 1 : 1.3 किंवा 1: 1.4 राहील. या प्रस्तावावर भाजपाला विचार करायला हवा, असे म्हटले होते. 

यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी प्रत्यूत्तर दिले होते. त्यांनी किशोर यांचे नाव न घेता म्हटले की, काही लोक कोणत्या विचारधारेनुसार नाही, तर निवडणुकीचा डेटा गोळा करून ठोकताळे बांधण्याची कंपनी चालवत राजकारणात आले आहेत. ते आघाडी धर्माच्या विरोधात वक्तव्ये करून विरोधकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

किशोर यांच्या वक्तव्यावर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनीही आक्षेप घेतला आहे. जागावाटप प्रसारमाध्यमांसमोर नाही तर एकत्र बसून केले जाते, असे म्हटले. 

मोदी यांच्या टीकेवर किशोर यांनी जोरदार गहलाल केला. त्यांना परिस्थितीतून बनलेले मुख्यमंत्री म्हणून हिणवताना बिहारमध्ये नितीशकुमार यांचे नेतृत्व आणि जेडीयूला सर्वात मोठा पक्ष बनविण्याची भूमिका लोकांनी ठरवलेली आहे. कोणत्या दुसऱ्या पक्षाने किंवा नेत्याने नाही. 2015 मध्ये दारूण पराभव पत्करूनही राजकीय परिस्थिती बदलल्याने उपमुख्यमंत्री मोदींकडून राजनैतीक मर्यादा आणि विचारधारेवर ऐकणे हा सुखद अनुभव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा