शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 15:44 IST

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते.

पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असून जागा वाटपावरून भाजपा आणि नितिशकुमार यांच्या जेडीयूमध्ये कलगीतुरा रंगला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादासारखी कोणतीही गोष्ट नसून सारे काही ठीक असल्याचे म्हटले आहे. 

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जुना जागा वाटपाचा फॉर्म्युला चालणार नाही. नवीन फॉर्म्युल्यानुसार जागांचे वाटप झाले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात. भाजपासोबत यावेळी जागांचे वाटप 1 : 1.3 किंवा 1: 1.4 राहील. या प्रस्तावावर भाजपाला विचार करायला हवा, असे म्हटले होते. 

यावर उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी प्रत्यूत्तर दिले होते. त्यांनी किशोर यांचे नाव न घेता म्हटले की, काही लोक कोणत्या विचारधारेनुसार नाही, तर निवडणुकीचा डेटा गोळा करून ठोकताळे बांधण्याची कंपनी चालवत राजकारणात आले आहेत. ते आघाडी धर्माच्या विरोधात वक्तव्ये करून विरोधकांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

किशोर यांच्या वक्तव्यावर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांनीही आक्षेप घेतला आहे. जागावाटप प्रसारमाध्यमांसमोर नाही तर एकत्र बसून केले जाते, असे म्हटले. 

मोदी यांच्या टीकेवर किशोर यांनी जोरदार गहलाल केला. त्यांना परिस्थितीतून बनलेले मुख्यमंत्री म्हणून हिणवताना बिहारमध्ये नितीशकुमार यांचे नेतृत्व आणि जेडीयूला सर्वात मोठा पक्ष बनविण्याची भूमिका लोकांनी ठरवलेली आहे. कोणत्या दुसऱ्या पक्षाने किंवा नेत्याने नाही. 2015 मध्ये दारूण पराभव पत्करूनही राजकीय परिस्थिती बदलल्याने उपमुख्यमंत्री मोदींकडून राजनैतीक मर्यादा आणि विचारधारेवर ऐकणे हा सुखद अनुभव आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा