शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नितीश कुमारांचे सरकार आणि श्रावण मास... तुम्हाला माहिती आहे का 'हे' खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 09:21 IST

Nitish Kumar, Bihar: नितीश कुमारांचे राजकारण अनेकांना समजण्यापलीकडले आहे.

Nitish Kumar, Bihar Politics: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता सर्वांच्या नजरा बिहारकडे लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्येहीराजकारण रंगले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आतापर्यंत सत्ताधारी पक्ष जेडीयूकडून यासाठी स्पष्ट नकार दिला जात आहे. नितीश कुमार यांचा पक्ष पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की बिहारमध्ये कोणताही राजकीय खेळी होणार नाही. पण या दरम्यान आता काही अशा गोष्टी घडताना दिसल्या आहेत की त्यामुळे राजकीय घटनाक्रम बरंच काही सांगून जातो आणि त्यावरूनच बिहारचे महाआघाडीचे सरकार स्वत: नितीश कुमारच पुन्हा पाडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नितीशकुमारांनी सरकार बनवले आणि पाडले!

नितीशकुमारांचे राजकारण समजून घेणे अवघडच नाही तर अशक्य आहे. नितीशकुमार सायलेंट मोडमध्ये गेले तर ते समजण्यास अधिकच कठीण होतात. नितीशकुमार सध्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय असले तरी त्यांच्या पक्षाचे नेतेही सातत्याने वक्तव्ये करत आहेत. पण त्यामागील राजकारण आधी समजून घ्यावे लागेल. राजकीय पंडित सांगतात की नितीशकुमार यांची स्वतःची एक विचारपद्धती आहे. त्याच घटनाक्रमाने नितीशकुमार स्वत: सरकार बनवतात आणि नंतर पाडतात.

श्रावण महिन्याशी नितीश कुमारांचा संबंध काय? 

बिहारमध्ये सध्या 2017 सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लालू-राबडींसोबतच सीबीआयने तेजस्वी यादव यांनाही 'लँड फॉर जॉब्स' प्रकरणात आरोपी बनवले आहे. तेव्हापासून बिहारमधील सरकारची स्थिती डळमळीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बिहारमध्ये कधीही काहीही होऊ शकते. या गोष्टींचा संबंध श्रावण महिन्याशी जोडला जात आहे. नितीशकुमार श्रावणातच सरकार बनवतात आणि पाडतातही. 2017 असो वा 2022, श्रावण महिन्यातच नितीशकुमार यांनी राजकीय सत्ताबदल करून सरकार पाडले आणि नंतर पुन्हा नवे सरकार श्रावणातच स्थापन केले.

नितीशकुमारांची विचारपद्धती समजून घ्यायची म्हटल्यास, नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची राजभवनात भेट घेतली होती. त्याच दिवशी भाजप नेते सुशील मोदी यांनीही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांची वन-टू-वन भेट घेतली. यादरम्यान त्यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचीही भेट घेतली. दोन्ही नेते कधी भेटले याबद्दल कुणालाही नीट माहिती नाही. हरिवंश नारायण सिंह यांनी पाटणा सोडले तेव्हा मीडियाला यासंबंधी थोडी माहिती मिळाली. पण या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

दुसरीकडे, नितीश कुमार ज्या आमदार-खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटायचे आणि ते बाहेर आल्यावर तेच बोलायचे की नितीशकुमार यांनी फीडबॅक घेण्यासाठी बोलावले होते. आता प्रश्न असा पडतो की, अचानक नितीश कुमार आपल्या आमदार-खासदारांकडून फीडबॅक का घेऊ लागले आहेत? नितीश कुमारांच्या मनात काय चालले आहे? हे असे प्रश्न आहेत. त्यामुळे राजकीय उलथापालथ होणार की काय, असे बोलले जात आहे.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाPoliticsराजकारण