शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

झारखंडमध्ये भाजपाला नितिशकुमारांचा 'दे धक्का'; सत्तेची गणिते बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:29 IST

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत.

रांची : लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम केंद्रीय मंत्रिपदावरून नाराज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली असून तेथील मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपटणाऱ्या भाजपाच्या बंडखोर मंत्र्याला थेट पाठिंबाच जाहीर करून टाकला आहे. यामुळे झारखंडमध्ये आधीच एक मित्रपक्ष गमावणाऱ्या भाजपासमोर विजयाचे फासे उलटताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयु स्वबळावर ही निवडणूक लढत आहे. आतापर्यंत त्यांनी २५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर एनडीएचा घटक पक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे. असे असताना भाजपाचे मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. याला नितिशकुमार खतपाणी घालत आहेत.

भाजपाच्या अडचणी एवढ्याच नाहीत तर बिहारचे भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे राय यांचे चांगले मित्र आहेत. नितिश कुमार यांचीही राय यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. राय यांच्या या संबंधांचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता असल्याने भाजपाने मोदी यांनाच स्टार प्रचारकाच्या यादीतून वगळले होते. राय यांनी बंडखोरी करताच नितिश कुमार यांनी उघडपणे राय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राय यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार करणार असल्याचेही म्हटले आहे. 

दुसरीकडे झारखंड मुक्ती मोचार्चे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनीही राय यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. नितिशकुमार यांच्या या भुमिकेमुळे जदयूचे उमेदवार जमशेदपूरमध्ये येऊनही उमेदवारी अर्ज न भरताच माघारी गेले. पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातील दोन्ही उमेदवार होते. नितिशकुमार यांनी जदयूच्या कार्यकर्त्यांना राय यांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. राय यांच्यासाठी नितिशकुमार तीन सभा घेणार आहेत. नितिशकुमार यांच्याशी मैत्री असल्याने आपल्याला उमेदवारी नाकारल्याचा आरोप राय यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड