शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 22:50 IST

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे.

ठळक मुद्देदेशातील तब्बल 15 ठिकाणं आहेत "हाय केस लोड"15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहेमहाराष्ट्रातील दोन जिल्ह्ये देशातील टॉप 7 जिल्ह्यांमध्ये

 नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत आता कोरोनाने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी तर, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसह देशातील 15 ठिकाणे ही "हाय केस लोड" असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढाईतील भारताचे यश, हे याच ठिकाणांवर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

15 ठिकाणांपैकी 'या' 7 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोना रुग्ण -  

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे. देशातील या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तेलंगाणातील हैदराबाद, गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानातील जयपूर आणि देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

ही 8 ठिकाणं होत चाललीयेत गंभीर -

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत देशातील 8 ठिकाणं, ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहेत. यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. यात, गुजरातमधील वडोदरा, आंध्र प्रदेशातील कुरनूल, मध्य प्रदेशातील भोपाळ, राजस्थानातील जोधपूर, उत्तर प्रदेशातील आग्रा, महाराष्ट्रातील ठाणे, तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील सूरतचा समावेश आहे. 

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

अमिताभ कांत यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, की "हे 15 जिल्हे आपल्या लढाईत अत्यंत महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे यातील 7 जिल्ह्यांमध्ये तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना विरोधातील भारताचे यश याच जिल्ह्यांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यांवर आपल्याला काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, परिक्षण करावे लागेल आणि उपचार करावे लागतील." 

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. कोरोनामुळे देशात 29,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPuneपुणेthaneठाणेMumbaiमुंबईNIti Ayogनिती आयोग