शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 22:50 IST

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे.

ठळक मुद्देदेशातील तब्बल 15 ठिकाणं आहेत "हाय केस लोड"15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहेमहाराष्ट्रातील दोन जिल्ह्ये देशातील टॉप 7 जिल्ह्यांमध्ये

 नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत आता कोरोनाने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी तर, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसह देशातील 15 ठिकाणे ही "हाय केस लोड" असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढाईतील भारताचे यश, हे याच ठिकाणांवर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

15 ठिकाणांपैकी 'या' 7 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोना रुग्ण -  

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे. देशातील या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तेलंगाणातील हैदराबाद, गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानातील जयपूर आणि देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

ही 8 ठिकाणं होत चाललीयेत गंभीर -

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत देशातील 8 ठिकाणं, ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहेत. यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. यात, गुजरातमधील वडोदरा, आंध्र प्रदेशातील कुरनूल, मध्य प्रदेशातील भोपाळ, राजस्थानातील जोधपूर, उत्तर प्रदेशातील आग्रा, महाराष्ट्रातील ठाणे, तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील सूरतचा समावेश आहे. 

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

अमिताभ कांत यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, की "हे 15 जिल्हे आपल्या लढाईत अत्यंत महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे यातील 7 जिल्ह्यांमध्ये तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना विरोधातील भारताचे यश याच जिल्ह्यांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यांवर आपल्याला काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, परिक्षण करावे लागेल आणि उपचार करावे लागतील." 

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. कोरोनामुळे देशात 29,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPuneपुणेthaneठाणेMumbaiमुंबईNIti Ayogनिती आयोग