शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये विजय आवश्यक, महाराष्ट्रातील 3 जिल्हे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 22:50 IST

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे.

ठळक मुद्देदेशातील तब्बल 15 ठिकाणं आहेत "हाय केस लोड"15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहेमहाराष्ट्रातील दोन जिल्ह्ये देशातील टॉप 7 जिल्ह्यांमध्ये

 नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत आता कोरोनाने दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी तर, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादसह देशातील 15 ठिकाणे ही "हाय केस लोड" असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढाईतील भारताचे यश, हे याच ठिकाणांवर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

15 ठिकाणांपैकी 'या' 7 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोना रुग्ण -  

"हाय केस लोड" म्हणून उल्लेख केलेल्या 15 ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील 2 जिल्हे तर टॉप 7मध्ये आहे. देशातील या 7 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तेलंगाणातील हैदराबाद, गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, महाराष्ट्रातील पुणे, राजस्थानातील जयपूर आणि देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

ही 8 ठिकाणं होत चाललीयेत गंभीर -

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत देशातील 8 ठिकाणं, ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहेत. यात महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे. यात, गुजरातमधील वडोदरा, आंध्र प्रदेशातील कुरनूल, मध्य प्रदेशातील भोपाळ, राजस्थानातील जोधपूर, उत्तर प्रदेशातील आग्रा, महाराष्ट्रातील ठाणे, तामिळनाडूतील चेन्नई आणि गुजरातमधील सूरतचा समावेश आहे. 

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

अमिताभ कांत यांनी एक ट्विट करत म्हटले आहे, की "हे 15 जिल्हे आपल्या लढाईत अत्यंत महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे यातील 7 जिल्ह्यांमध्ये तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोना विरोधातील भारताचे यश याच जिल्ह्यांवर अवलंबून आहे. या जिल्ह्यांवर आपल्याला काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, परिक्षण करावे लागेल आणि उपचार करावे लागतील." 

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. कोरोनामुळे देशात 29,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPuneपुणेthaneठाणेMumbaiमुंबईNIti Ayogनिती आयोग