शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:08 IST

नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट झाली असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला होता. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल एँड पब्लिक एफेअर्स'च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा मी नेहमीच आदर करते.  भारताचा विकासदर जेव्हा उंचावर होता. त्यावेळी रघुराम राजन यांनी देशातील मध्यवर्ती बँकेचे नेतृत्त्व केले होते. मात्र रघुराम राजन यांच्या कार्यकाळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर काही लोकांना कर्ज देण्यात आले. या कारणांमुळेच बँकांना आज शिक्षेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल व्हिजन होती. परंतु तरीही बँकांची स्थिती वाईट झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली होती. तसेच सुस्तावलेल्या आर्थिक परिस्थितीला नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे. जर हे दोन्ही निर्णय जनता आणि अर्थव्यवस्थेवर लादले नसते तर अर्थव्यवस्थेनं चांगलं प्रदर्शन केलं असतं. सरकारनं कोणाचाही सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. नोटाबंदीनं जनतेचं नुकसानच झालं असून, त्यानं काहीही निष्पन्न झालं नसल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले होते.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRaghuram Rajanरघुराम राजनManmohan Singhमनमोहन सिंगEconomyअर्थव्यवस्थाbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक