शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

निर्मला सीतारामन म्हणतात, 'त्या' दोघांमुळे बँकांची स्थिती वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:08 IST

नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट झाली असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला होता. मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल एँड पब्लिक एफेअर्स'च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा मी नेहमीच आदर करते.  भारताचा विकासदर जेव्हा उंचावर होता. त्यावेळी रघुराम राजन यांनी देशातील मध्यवर्ती बँकेचे नेतृत्त्व केले होते. मात्र रघुराम राजन यांच्या कार्यकाळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर काही लोकांना कर्ज देण्यात आले. या कारणांमुळेच बँकांना आज शिक्षेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकासानातून बाहेर पडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी मदत निधीवर अवलंबून असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल व्हिजन होती. परंतु तरीही बँकांची स्थिती वाईट झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थव्यवस्थेबाबत त्यांच्या पतीने दिलेला सल्ला ऐकणार का?: शरद पवार

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली होती. तसेच सुस्तावलेल्या आर्थिक परिस्थितीला नोटाबंदी आणि जीएसटी जबाबदार आहे. जर हे दोन्ही निर्णय जनता आणि अर्थव्यवस्थेवर लादले नसते तर अर्थव्यवस्थेनं चांगलं प्रदर्शन केलं असतं. सरकारनं कोणाचाही सल्ला न घेता नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. नोटाबंदीनं जनतेचं नुकसानच झालं असून, त्यानं काहीही निष्पन्न झालं नसल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले होते.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनRaghuram Rajanरघुराम राजनManmohan Singhमनमोहन सिंगEconomyअर्थव्यवस्थाbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक