शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“तुमचा खूप सन्मान करते, पण ही अपेक्षा नव्हती”; मनमोहन सिंग यांना सीतारामन यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 22:32 IST

राष्ट्रीय शेअर बाजारात घडत असलेल्या गोष्टींचा साधा सुगावाही मनमोहन सिंग सरकारला लागला नाही, असा पलटवार निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडील देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. यातच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग तुमचा मी खूप सन्मान करते. मात्र, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 

तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे. आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात, असे टीकास्त्र मनमोहन सिंग यांनी सोडले. मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला. याला आता निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, त्यांना (मनमोहन सिंग) भारताला सर्वांत कमकुवत बनवल्याबाबत आणि देशातील तीव्र महागाईवरून स्मरण केले जाते. मला तुमच्याबद्दल (मनमोहन) खूप आदर आहे. परंतु, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. यावेळी एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी देशातील सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी हिमालयातील योगींचा सल्ला घेतल्याच्या अलीकडील खुलाशांचा निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला आणि मनमोहन सिंग यांना सत्तेत असताना या सर्व गोष्टींचा सुगावाही लागला नाही, असा टोला लगावला. सीतारामन यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील निर्यात आणि थेट विदेशी गुंतवणुकीची आकडेवारीच दिली. 

दरम्यान, केंद्र सरकारने हेदेखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच. मोठमोठ्या गोष्टी बोलणे सोपे असते पण त्या अंमलात आणणे खूप अवघड असते, असे परखड मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण