शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’च्या सर्व खुन्यांची आजची फाशी टळली, एका दोषीच्या दया अर्जामुळे शिक्षा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:46 IST

डेथ वॉरन्टनुसार या चौघांना शनिवारी सकाळी सात वाजता फासावर लटविले जाणार होते.

नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यातील मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा व अक्षय कुमार सिंग या चौघांची फाशी तूर्तास टळली आहे. विनय शर्माने राष्ट्रपतींकडे केलेल्या दयेच्या अर्जावर निर्णय व्हायचा असल्याने, डेथ वॉरन्ट काढणाऱ्या सत्र न्यायालयाने फाशीची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलली. डेथ वॉरन्टनुसार या चौघांना शनिवारी सकाळी सात वाजता फासावर लटविले जाणार होते. जल्लादाने फाशीची रंगीत तालीमही केली होती.

तुरुंग नियमावलीनुसार फाशी झालेल्या गुन्हेगाराचे शिक्षेविरुद्ध दाद मागण्याचे सर्व मार्ग संपल्यानंतर, किमान १४ दिवसांनंतर फाशी देण्याचे बंधन आहे. विनयच्या दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी लगेच निर्णय दिला, तरी डेथ वॉरन्टनुसार ठरलेल्या फाशीच्या तारखेने नियमाची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे १ फेब्रुवारीची फाशी स्थगित करावी, असा अर्ज चारही खुन्यांनी केला होता. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी पुढील आदेशापर्यंत चौघांपैकी कोणालाही फाशी न देण्याचा आदेश दिला.

एकट्या पवनमुळे सर्वांची फाशी थांबविण्याची गरज नाही. त्याला वेगळे ठेवून बाकीच्या तिघांना ठरल्याप्रमाणे फाशी देण्यात काहीच अडचण नाही, अशी भूमिका तिहार कारागृह प्रशासनाने मांडली. निर्भयाच्या पालकांनी व पब्लिक प्रॉसिक्युटरने नवीन कारणे काढून फाशी टाळण्याचे प्रयत्न सहन केले जाऊ नयेत, असा आग्रह धरला.

दिल्ली तुरुंग नियमावलीचा हवाला देत न्यायाधीशांनी नमूद केले की, विनय शर्माच्या दयेच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत त्याला फाशी देता येणार नाही, हे स्पष्ट आहे. नियमानुसार एखाद्या प्रकरणात एकाहून अनेकांना फाशी झाली असेल व एकाचा जरी अर्ज प्रलंबित असेल, तर त्याचा निर्णय होईपर्यंत इतरांना फाशी देता येत नाही.

निर्भयाच्या पालकांचा मुद्दा होता की, विनयने ७ दिवसांच्या मुदतीनंतर दयेचा अर्ज केला असल्याने, त्या कारणाने डेथ वॉरन्टला स्थगिती देता येत नाही. तो फेटाळताना न्यायाधीश म्हणाले की, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी डेथ वॉरन्ट काढण्याचा अधिकार या न्यायालयास दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१३ अन्वये आहे व ते स्थगित करण्याचाही अधिकार आहे.प्रत्येकाला कायद्यानुसार दाद मागण्याची प्रत्येक संधी उपलब्ध करून देणे हे सुबुद्ध समाजाचे लक्षण आहे. गुन्हेगारास फाशी झाली आहे. त्याच्या कायदेशीर हक्कांकडे न्यायालये कानाडोळा करू शकत नाहीत.-धर्मेंद्र राणा, अतिरिक्त सत्र न्यायाधीश

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप