शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Nipah virus: निपाह विषाणूचा धोका वाढला, अशी आहेत लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:54 IST

Nipah virus update: केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली -केरळमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यातच राज्यात निपाह विषाणूचेही रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात निपाहचा पहिला रुग्ण सापडला आहे. (Nipah virus) त्यामुळे येथे एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे निपाह विषाणूबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निपाह विषाणूची लक्षणे आणि त्यापासून बचावासाठीच्या उपाययोजना जाणून घेऊयात. (Increased risk of Nipah virus, symptoms and measures to prevent it)

निपाह विषाणू एक जुनोटिक आजार आहे. तो प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा विषाणू केवळ ज्यांच्या पाठीला कणा आहे अशाच प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये येतो. तसेच माणसांमधून माणसांमध्येही या विषाणूचा फैलाव झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. सर्वप्रथण मलेशियामध्ये डुक्कर पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये याची लक्षणे दिसून आली होती. बंगालमधील सिलीगुडीमध्ये २००१ आणि २००७ मध्ये हा आजार दिसून आला होता. हा विषाणू बहुतांशी एका विशिष्ट्य भागातच राहतो. तसेच रोगी संपर्कात आल्यास पसरतो.

निपाह विषाणूच्या संसर्गाची लक्षणे - जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला ताप, डोकेदुखी, स्नायूंचे दुखणे, उलटी आणि घशामध्ये खवखव अशी लक्षणे दिसून येतात. - त्यानंतर चक्कर येणे आणि एन्सेफललायटीससुद्धा होऊ शकतो. काही रुग्णांना असामान्य निमोनिया आणि श्वसनासंबंधीच्या गंभीर समस्या दिसून येतात. - गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या रुग्णाला एन्सेफलायटीस आणि झटके येऊ शकतात. त्यानंतर रुग्ण २४ ते ४८ तासांमध्ये कोमात जाऊ शकतो. हा विषाणू ४ ते १४ दिवसांपर्यंत अॅक्टिव्ह राहतो. निपाह विषाणू हा बाधित डुक्कर किंवा फळ खाणाऱ्या वटवाघळांच्या माध्यमातून फैलावतो. बांगलादेश आणि भारतामध्ये हा विषाणू सर्वसामान्यपणे फळे किंवा फलांपासून घेण्यात येणाऱ्या उत्पादनांपासून पसरतो. त्याच्या संसर्गाचे सर्वात मोठे कारण हेच आहे.  

बचावासाठीचे उपाय - जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जर निपाह विषाणूच्या संसर्गाचा संशय असल्यास त्या जनावरांचा परिसर त्वरित सोडला पाहिजे. तसेच ही जागा क्वारेंटाईन केली पाहिजे.- लोकांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी बाधित जनावरांना नष्ट करावे, तसेच या जनावरांचे मृतदेह तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दफन करा- बाधित शेतांमधून प्राण्यांची ये जा आणि अन्य भागात प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे आजाराचा प्रसार कमी करता येऊ शकतो. कच्च्या खजुराचा रस किंवा ताडीचे सेवक करता कामा नये. केवळ धुतलेल्या फळांचे सेवक करावे. जमिनीवर पडलेली अर्धवट फळे खाणे टाळा  

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूIndiaभारतHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स