शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:52 IST

काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे

ठळक मुद्देकाश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घटगतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असतराष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई यासाठी जबाबदार

जम्मू - काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे. यावेळी एस पी वैद यांनी काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याबद्दल तेथील लोकांना श्रेय दिलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई जबाबदार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. गतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत अशी माहिती त्यांनी दिली. 

'काश्मीर खो-यात गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहिल्यास, यावर्षी 90 टक्क्यांहून जास्त घट झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 'जिथे गतवर्षी दिवसाला 50 हून जास्त दगडफेकीच्या घटना घडायच्या, तिछे सध्या असे अनेक आठवडे पहायला मिळत आहेत जेव्हा दगडफेकीची एकही घटना समोर येत नाहीये. लोकांच्या वृत्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा आहे. खासकरुन काश्मीरमध्ये राहणा-या किंवा तेथील परिस्थितीचा सामना करणा-यांसाठी कायदा - सुव्यवस्था महत्वाचा विषय आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'काश्मीर खो-यातील परिस्थिती खूप सुधारली आहे हे सहजपणे लक्षात येत आहे. संपुर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना समोर येत नाहीये. इतकंच नाही तर अनेकदा संपुर्ण आठवडा शांतता राहत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी जेव्हा दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत, त्यातही घट झाली आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 

'परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे परिस्थिती सुधारली असा दावा केला जात आहे. पण मी याच्याशी सहमत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेमुळे मदत झाली, पण मुख्य श्रेय जातं ते काश्मीरमधील जनतेला. कदाचित त्यांनाही याचे तोटे लक्षात आले असतील. आपल्याच संपत्तीचं नुकसान करत, आपल्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले करणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात येत असाव. याशिवाय मुख्य दहशतवाद्यांवर करण्यात आलेली कारवाईही कारणीभूत आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर