शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:52 IST

काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे

ठळक मुद्देकाश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घटगतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असतराष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई यासाठी जबाबदार

जम्मू - काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे. यावेळी एस पी वैद यांनी काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याबद्दल तेथील लोकांना श्रेय दिलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई जबाबदार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. गतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत अशी माहिती त्यांनी दिली. 

'काश्मीर खो-यात गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहिल्यास, यावर्षी 90 टक्क्यांहून जास्त घट झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 'जिथे गतवर्षी दिवसाला 50 हून जास्त दगडफेकीच्या घटना घडायच्या, तिछे सध्या असे अनेक आठवडे पहायला मिळत आहेत जेव्हा दगडफेकीची एकही घटना समोर येत नाहीये. लोकांच्या वृत्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा आहे. खासकरुन काश्मीरमध्ये राहणा-या किंवा तेथील परिस्थितीचा सामना करणा-यांसाठी कायदा - सुव्यवस्था महत्वाचा विषय आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'काश्मीर खो-यातील परिस्थिती खूप सुधारली आहे हे सहजपणे लक्षात येत आहे. संपुर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना समोर येत नाहीये. इतकंच नाही तर अनेकदा संपुर्ण आठवडा शांतता राहत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी जेव्हा दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत, त्यातही घट झाली आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 

'परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे परिस्थिती सुधारली असा दावा केला जात आहे. पण मी याच्याशी सहमत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेमुळे मदत झाली, पण मुख्य श्रेय जातं ते काश्मीरमधील जनतेला. कदाचित त्यांनाही याचे तोटे लक्षात आले असतील. आपल्याच संपत्तीचं नुकसान करत, आपल्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले करणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात येत असाव. याशिवाय मुख्य दहशतवाद्यांवर करण्यात आलेली कारवाईही कारणीभूत आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर