शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:52 IST

काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे

ठळक मुद्देकाश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घटगतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असतराष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई यासाठी जबाबदार

जम्मू - काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे. यावेळी एस पी वैद यांनी काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याबद्दल तेथील लोकांना श्रेय दिलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई जबाबदार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. गतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत अशी माहिती त्यांनी दिली. 

'काश्मीर खो-यात गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहिल्यास, यावर्षी 90 टक्क्यांहून जास्त घट झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 'जिथे गतवर्षी दिवसाला 50 हून जास्त दगडफेकीच्या घटना घडायच्या, तिछे सध्या असे अनेक आठवडे पहायला मिळत आहेत जेव्हा दगडफेकीची एकही घटना समोर येत नाहीये. लोकांच्या वृत्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा आहे. खासकरुन काश्मीरमध्ये राहणा-या किंवा तेथील परिस्थितीचा सामना करणा-यांसाठी कायदा - सुव्यवस्था महत्वाचा विषय आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'काश्मीर खो-यातील परिस्थिती खूप सुधारली आहे हे सहजपणे लक्षात येत आहे. संपुर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना समोर येत नाहीये. इतकंच नाही तर अनेकदा संपुर्ण आठवडा शांतता राहत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी जेव्हा दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत, त्यातही घट झाली आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 

'परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे परिस्थिती सुधारली असा दावा केला जात आहे. पण मी याच्याशी सहमत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेमुळे मदत झाली, पण मुख्य श्रेय जातं ते काश्मीरमधील जनतेला. कदाचित त्यांनाही याचे तोटे लक्षात आले असतील. आपल्याच संपत्तीचं नुकसान करत, आपल्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले करणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात येत असाव. याशिवाय मुख्य दहशतवाद्यांवर करण्यात आलेली कारवाईही कारणीभूत आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर