शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:52 IST

काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे

ठळक मुद्देकाश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घटगतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असतराष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई यासाठी जबाबदार

जम्मू - काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे. यावेळी एस पी वैद यांनी काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याबद्दल तेथील लोकांना श्रेय दिलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई जबाबदार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. गतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत अशी माहिती त्यांनी दिली. 

'काश्मीर खो-यात गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहिल्यास, यावर्षी 90 टक्क्यांहून जास्त घट झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 'जिथे गतवर्षी दिवसाला 50 हून जास्त दगडफेकीच्या घटना घडायच्या, तिछे सध्या असे अनेक आठवडे पहायला मिळत आहेत जेव्हा दगडफेकीची एकही घटना समोर येत नाहीये. लोकांच्या वृत्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा आहे. खासकरुन काश्मीरमध्ये राहणा-या किंवा तेथील परिस्थितीचा सामना करणा-यांसाठी कायदा - सुव्यवस्था महत्वाचा विषय आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

'काश्मीर खो-यातील परिस्थिती खूप सुधारली आहे हे सहजपणे लक्षात येत आहे. संपुर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना समोर येत नाहीये. इतकंच नाही तर अनेकदा संपुर्ण आठवडा शांतता राहत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी जेव्हा दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत, त्यातही घट झाली आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 

'परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे परिस्थिती सुधारली असा दावा केला जात आहे. पण मी याच्याशी सहमत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेमुळे मदत झाली, पण मुख्य श्रेय जातं ते काश्मीरमधील जनतेला. कदाचित त्यांनाही याचे तोटे लक्षात आले असतील. आपल्याच संपत्तीचं नुकसान करत, आपल्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले करणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात येत असाव. याशिवाय मुख्य दहशतवाद्यांवर करण्यात आलेली कारवाईही कारणीभूत आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर