आरीफ माजिदला आठ डिसेंबरपर्यंत NIA ची कोठडी
By Admin | Updated: November 29, 2014 15:33 IST2014-11-29T14:52:28+5:302014-11-29T15:33:04+5:30
इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आरीफ माजिदला आठ डिसेंबरपर्यंत NIA ची कोठडी
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २९ - इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या व भारतात परत आणण्यात आलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण येथून अचानक गायब होऊन इराक आणि सीरियात इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने चालवलेल्या संघर्षात सामील झालेल्या चार तरुणांपैकी आरिफ माजिद हा तरुण रिसर्च अँड अनालीसिस विंग (रॉ) या हेर संस्थेच्या प्रयत्नांतून शुक्रवारी तुर्कस्थानमधून भारतात परतला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
माजिद कुणा कुणाच्या संपर्कात होता, भारतामध्ये इसिससाठी आणखी कोण काम करत आहे, इराकमध्ये तो कुणाला भेटला, त्यानं नक्की तिथे काय केलं, त्याच्यावर भारतामध्ये काही कामगिरी पार पाडण्याची तर जबाबदारी दिलेली नाही ना, अशा अनेक प्रश्नांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेने माजिदची कोठडी मागितली होती. न्यायालयाने एनआयआयचे हे म्हणणे मान्य करत आठ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या चेह-यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे त्याचे ब्रेनवॉशिंग पद्धतशीरपणे झाले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच माजिदप्रमाणे आणखी किती भारतीय तरूण अशा प्रकारच्या ब्रेनवॉशिंगचे शिकार झाले आहेत हा प्रश्नही एनआयआयपुढे आहे.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर काही तासांतच केंद्रीय गृहखात्याने त्याला अटक करण्याची सूचना एनआयएला केली. आरिफसह इसिस आणि या दहशतवादी संघटनेच्या हस्तकांविरोधात भा.दं.वि.च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो दोषी सिद्ध झाल्यास आरिफला अधिकाधिक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
आरिफला मुंबईत आणल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तसेच त्याला सकाळी मुंबईत आणल्याचे सुरक्षा यंत्रणोकडून त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आले होते, असेही सुत्रांनी सांगितले.
शुक्रवारी दिवसभर एनआयएने आरिफला त्याने मे महिन्यात घर सोडण्यापासून आजवरच्या घटनाक्रमाबाबत विचारणा केली, असे सूत्रांनी सांगितले. मात्र त्याच्या परतण्याने बरेच प्रश्न उभे केले असून, त्याच्या तपासातून या तरुणांची माथी भडकवणा:यांचा तसेच त्यांना भारतात आणि इराकमध्ये साहाय्य करणा-यांचा छडा लागू शकतो.
कल्याणमधील आरिफ माजिद, शहीन टंकी, फहद शेख आणि अमान तांडेल हे चार जण 23 मे रोजी अन्य 22 जणांबरोबर इराकमधील धार्मिक स्थळांची तीर्थयात्र करण्याच्या निमित्ताने विमानाने बगदादला गेले होते.
दुस:या दिवशी आरिफने त्याच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून कळवले होते, की ते इराकला गेले आहेत आणि पूर्वसूचना न देता गेल्याबद्दल माफी मागितली होती. भारतात परतल्यावर त्यांच्या सहप्रवाशांनी हे चौघे बगदादहून टॅक्सी भाडय़ाने घेऊन इराकमधील फालुजा येथे गेल्याचे सांगितले होते. दरम्यान, यापैकी एकाच्या मृत्यूचेही वृत्त आले होते.