शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Saurabh Bhardwaj : “पुढचा नंबर माझा मग आतिशी...”; सौरभ भारद्वाज यांनी सांगितली AAP नेत्यांच्या अटकेची क्रोनोलॉजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:04 IST

AAP Saurabh Bhardwaj : सौरभ भारद्वाजही मीडियासमोर आले आणि म्हणाले की, रामलीला मैदानावरील रॅलीमुळे भाजपा अस्वस्थ झाली आहे आणि आमच्या आणखी नेत्यांना अटक करण्याची तयारी करत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपासून आम आदमी पार्टी भाजपा आणि केंद्र सरकारवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दावा केला की, भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर सौरभ भारद्वाजही आता मीडियासमोर आले आणि म्हणाले की, रामलीला मैदानावरील रॅलीमुळे भाजपा अस्वस्थ झाली आहे आणि आमच्या आणखी नेत्यांना अटक करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पुढचा नंबर माझा आणि मग आतिशी यांचा आहे. 

सौरभ भारद्वाज म्हणाले, "जेव्हा आम्ही 31 मार्चच्या रॅलीपूर्वी चर्चेला बसलो होतो, तेव्हा लोकांमध्ये शंका होत्या. सिसोदिया आणि संजय सिंह जेलमध्ये आहेत, अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. या रॅलीसाठी लोक येणार का?, लोकांचा आपवर विश्वास आहे का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर लोकांची गर्दी पाहून भाजपाला धक्का बसला कारण विरोधी पक्षांचे सर्व मोठे नेते मंचावर जमले होते."

"आम्ही या नेत्यांना फोन करून सांगितलं की, आमचे नेते तुरुंगात आहेत. आम्ही दिल्लीत मोठी रॅली काढत आहोत. आमच्याकडे या लोकांचे नंबरही नव्हते. आम्ही लोकांना फोन करून त्यांचे नंबर मागितले. तेव्हा ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. आम्ही नक्की येऊ. इतके मोठे नेते आले की आता भाजपाला काळजी वाटू लागली आहे. भाजपाने सर्व काही केले आणि आमच्या नेत्यांना अटक केली, तरीही पक्ष उभा आहे आणि आता पक्ष भक्कमपणे उभा आहे हे जनतेला देखील समजलं आहे."

"दादागिरी झाली आता गुंडगिरी उघडपणे सुरू” केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना सौरभ भारद्वाज यांनी "दादागिरी झाली आता गुंडगिरी उघडपणे सुरू आहे. जरी मी हे म्हटलं नाही तरी संपूर्ण देशातील जनतेला हे माहीत आहे की त्यांना धमकावून यांना राज्य करायचं आहे. अतिशीने पत्रकार परिषदेत सांगितलं की, आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून ऑफर आली आहे. जर तुम्ही पक्ष सोडला तर तुमचं चांगलं करियर बनवू. पण जर सोडला नाही तर महिन्याभरात जेलमध्ये जाल. अशी उघड धमकी" दिल्याचं म्हटलं आहे.

"'आप' भाजपाच्या स्वप्नात येते"

“आम्ही विचार केला होता की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर चार दिवस पक्ष कसा चालेल? मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दुसरे नेतृत्व म्हणून आले तेव्हा त्यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं. राघव चड्ढा, आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या नेतृत्वाची तिसरी फळी समोर आली. तर आता तिसऱ्या नेतृत्वाला जेलमध्ये टाकलं तर चौथे नेतृत्व समोर येईल. रामलीला मैदानातून उदयास आलेला हा पक्ष असून साहजिकच नेतृत्व उदयास येणार आहे. आज आम आदमी पार्टी भाजपाच्या स्वप्नात येते. 'आप' हा आज भाजपाचा शत्रू क्रमांक एकचा पक्ष आहे” असंही सौरभ यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :AAPआपlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा