शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

50 हजारांसाठी नव-यानं दिला तिहेरी तलाक ! म्हणे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 6:31 PM

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतायत. बरेलीमधल्या एका मुस्लिम पतीनं 50 हजारांसाठी पत्नीला मारझोड करत  तिहेरी तलाक दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यानं तिला घराबाहेर हाकललं. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, असंही तो नवरा म्हणाला आहे.पीडित महिला तरन्नूमनं पतीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या पतीनं पहिल्यांदा ...

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी तलाकच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतायत. बरेलीमधल्या एका मुस्लिम पतीनं 50 हजारांसाठी पत्नीला मारझोड करत तिहेरी तलाक दिला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यानं तिला घराबाहेर हाकललं. माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, असंही तो नवरा म्हणाला आहे.पीडित महिला तरन्नूमनं पतीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या पतीनं पहिल्यांदा मला मारहाण केली. त्यानंतर माझ्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्यावर त्यानं मला तिहेरी तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं, अशीही ती पीडित महिला म्हणाली आहे. तिहेरी तलाक दिल्यानंतर कोणी माझं काहीही वाकडं करू शकत नाही, असं नवरा म्हणाल्याचं पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितलं. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.  या प्रकारानंतर तरन्नूमही घाबरली. मे 2016मध्ये मुस्लिमांच्या रीतिरिवाजानुसार तरन्नूमचा विवाह सुभाषनगरमधल्या करेली येथील रफिकसोबत झाला होता. विवाहानंतर पती रफिक हा तरन्नूमला मारहाण करत होता. तसेच हुंड्यासाठी तिचा छळ करू लागला. दोन दिवसांपूर्वीच तो तरन्नूमच्या माहेरी गेला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर त्यानं तरन्नूमचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. वडील बचावासाठी मध्ये पडल्यानंतर रफिकनं त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात त्यानं तरन्नूमला तीनदा तलाक... तलाक... तलाक असं म्हणत तिहेरी तलाक दिला. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभेत तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. ते राज्यसभेत मांडल्यानंतर विरोधकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला होता. संसद अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यात केंद्राला अपयश आले असून, ते आता 29 जानेवारीपासून सुरू होणा-या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल. मात्र वटहुकूम काढण्याचा केंद्राचा विचार नाही. या विधेयकातील काही तरतुदींबाबत विरोधी पक्ष व तेलुगू देसमने आक्षेप घेत ते चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली. त्यामुळे विधेयकातील तरतुदींबाबत एकमत घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षांशी चर्चा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात आले तरी ते चिकित्सा समितीकडे विचारासाठी पाठवावे, यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधक आग्रह धरणार आहेत.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक