शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:05 IST

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आता फक्त कागदोपत्री तक्रारी करत नाही, तर थेट निर्णायक कारवाई करतो. नवा भारत दहशतवाद संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने राजकीय व लष्करी उद्दिष्टांची पूर्तता केल्याने सध्या ही कारवाई काही काळासाठी स्थगित केली आहे. ती संपुष्टात आली आहे, असा कोणीही समज करून घेऊ नये. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली तर पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. त्याच्या प्रारंभी ते म्हणाले की, भारतीय सैन्य नेहमीच सीमांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. ऑपरेशन सिंदूर ही अत्यंत प्रभावी आणि उत्तम समन्वय राखून केलेली कारवाई होती. ही मोहीम केवळ २२ मिनिटांत पूर्ण करण्यात आली आणि पहलगामच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे सर्वाधिक नुकसान आणि निरपराध नागरिकांना काहीही इजा होणार नाही, याची खबरदारी घेत ही मोहीम पार पाडण्यात आली. ही कारवाई करताना भारतावर बाह्यशक्तींचा दबाव होता, असे सांगणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे. पाकच्या लष्करी संचालनालयाच्या महासंचालकांनी हल्ला थांबविण्याची विनंती भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांना केली होती, अशी माहितीही सिंह यांनी दिली. भारत व पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडविण्याची मी मध्यस्थी केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

‘कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील’ 

पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी आले हे कसे कळाले?, ही माहिती कशी मिळाली?, याबाबत माहिती देण्यास एनआयए तयार नाही. कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील. ते पाकिस्तानातून आले होते याचा कोणताही पुरावा नाही. मग हे तुम्ही कसे मान्य करीत आहात, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केल्याने वाद झाला.

‘युद्ध थांबविण्याची विनंती पाकिस्ताननेच केली’

लष्करी कारवाई थांबविण्याची विनंती पाककडून भारताला करण्यात आली. या संघर्षादरम्यान अमेरिकेशी भारताची जी चर्चा झाली त्यात कुठेही व्यापाराचा मुद्दा व ऑपरेशन सिंदूर यांचा परस्परसंबंध लावण्यात आला नव्हता. भारताने पाकविरोधात केलेल्या कारवाईला १९० देशांपैकी पाकिस्तानसहित फक्त तीन देशांनी विरोध केला, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग