शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:05 IST

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आता फक्त कागदोपत्री तक्रारी करत नाही, तर थेट निर्णायक कारवाई करतो. नवा भारत दहशतवाद संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने राजकीय व लष्करी उद्दिष्टांची पूर्तता केल्याने सध्या ही कारवाई काही काळासाठी स्थगित केली आहे. ती संपुष्टात आली आहे, असा कोणीही समज करून घेऊ नये. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली तर पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. त्याच्या प्रारंभी ते म्हणाले की, भारतीय सैन्य नेहमीच सीमांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. ऑपरेशन सिंदूर ही अत्यंत प्रभावी आणि उत्तम समन्वय राखून केलेली कारवाई होती. ही मोहीम केवळ २२ मिनिटांत पूर्ण करण्यात आली आणि पहलगामच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे सर्वाधिक नुकसान आणि निरपराध नागरिकांना काहीही इजा होणार नाही, याची खबरदारी घेत ही मोहीम पार पाडण्यात आली. ही कारवाई करताना भारतावर बाह्यशक्तींचा दबाव होता, असे सांगणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे. पाकच्या लष्करी संचालनालयाच्या महासंचालकांनी हल्ला थांबविण्याची विनंती भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांना केली होती, अशी माहितीही सिंह यांनी दिली. भारत व पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडविण्याची मी मध्यस्थी केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

‘कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील’ 

पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी आले हे कसे कळाले?, ही माहिती कशी मिळाली?, याबाबत माहिती देण्यास एनआयए तयार नाही. कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील. ते पाकिस्तानातून आले होते याचा कोणताही पुरावा नाही. मग हे तुम्ही कसे मान्य करीत आहात, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केल्याने वाद झाला.

‘युद्ध थांबविण्याची विनंती पाकिस्ताननेच केली’

लष्करी कारवाई थांबविण्याची विनंती पाककडून भारताला करण्यात आली. या संघर्षादरम्यान अमेरिकेशी भारताची जी चर्चा झाली त्यात कुठेही व्यापाराचा मुद्दा व ऑपरेशन सिंदूर यांचा परस्परसंबंध लावण्यात आला नव्हता. भारताने पाकविरोधात केलेल्या कारवाईला १९० देशांपैकी पाकिस्तानसहित फक्त तीन देशांनी विरोध केला, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग