शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 06:05 IST

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आता फक्त कागदोपत्री तक्रारी करत नाही, तर थेट निर्णायक कारवाई करतो. नवा भारत दहशतवाद संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय लष्कराने राजकीय व लष्करी उद्दिष्टांची पूर्तता केल्याने सध्या ही कारवाई काही काळासाठी स्थगित केली आहे. ती संपुष्टात आली आहे, असा कोणीही समज करून घेऊ नये. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली तर पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत विशेष चर्चा सुरू झाली. त्याच्या प्रारंभी ते म्हणाले की, भारतीय सैन्य नेहमीच सीमांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. ऑपरेशन सिंदूर ही अत्यंत प्रभावी आणि उत्तम समन्वय राखून केलेली कारवाई होती. ही मोहीम केवळ २२ मिनिटांत पूर्ण करण्यात आली आणि पहलगामच्या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे सर्वाधिक नुकसान आणि निरपराध नागरिकांना काहीही इजा होणार नाही, याची खबरदारी घेत ही मोहीम पार पाडण्यात आली. ही कारवाई करताना भारतावर बाह्यशक्तींचा दबाव होता, असे सांगणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे हे चुकीचे आहे. पाकच्या लष्करी संचालनालयाच्या महासंचालकांनी हल्ला थांबविण्याची विनंती भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांना केली होती, अशी माहितीही सिंह यांनी दिली. भारत व पाकमध्ये मी शस्त्रसंधी घडविण्याची मी मध्यस्थी केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

‘कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील’ 

पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी आले हे कसे कळाले?, ही माहिती कशी मिळाली?, याबाबत माहिती देण्यास एनआयए तयार नाही. कदाचित हे दहशतवादी देशातीलच असतील. ते पाकिस्तानातून आले होते याचा कोणताही पुरावा नाही. मग हे तुम्ही कसे मान्य करीत आहात, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केल्याने वाद झाला.

‘युद्ध थांबविण्याची विनंती पाकिस्ताननेच केली’

लष्करी कारवाई थांबविण्याची विनंती पाककडून भारताला करण्यात आली. या संघर्षादरम्यान अमेरिकेशी भारताची जी चर्चा झाली त्यात कुठेही व्यापाराचा मुद्दा व ऑपरेशन सिंदूर यांचा परस्परसंबंध लावण्यात आला नव्हता. भारताने पाकविरोधात केलेल्या कारवाईला १९० देशांपैकी पाकिस्तानसहित फक्त तीन देशांनी विरोध केला, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनlok sabhaलोकसभाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग