शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाराष्ट्रासह ५ राज्यांत नवे राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 06:05 IST

या सर्व नेमणुका नवे राज्यपाल ज्यादिवशी पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून लागू होतील

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांच्यासह पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व ७७ वर्षाचे भाजप नेते कोश्यारी यांना नेमण्यात आले आहे.

या सर्व नेमणुका नवे राज्यपाल ज्यादिवशी पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून लागू होतील असे राष्ट्रपती भवनाच्या निवेदनात नमुद करण्यात आले. तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिळीसाई सुंदरराजन (५८ वर्षे) यांच्या नेमणुकीने तेलंगणाच्या निर्मितीनंतर त्या राज्याला प्रथमच स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत. भाजप नेते बंडारु लक्ष्मण (७२) हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल असतील. तेथे अलीकडेच नेमण्यात आलेले विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र (७८) यांची राजस्थानला बदली करण्यात आली आहे.शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करण्याचा कायदा करण्याच्या निषेधार्थ राजीव गांधी सरकारमधून राजीनामा दिलेले माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान (६८) यांच्याकडे केरळचे राज्यपालपद सोपविण्यात आले आहे. खान काँग्रेस सोडल्यानंतर आधी मायावतींच्या बसपत जाऊन नंतर भाजपवासी झाले होते. मात्र गेली दहा वर्षे ते सक्रिय राजकारणात नव्हते.तामिळनाडूत पक्षविस्तारासाठी भाजपची पावलेतामिळनाडूत आपले स्थान निर्माण करण्याचे भाजप कसून प्रयत्न करत आहेत. मात्र या राज्यात भाजपला किंचितसही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. त्यातच तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता रजनीकांत, कमल हसन यांच्या प्रवेशामुळे रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर तेथील भाजप प्रदेशाध्यक्ष तमिळीसाई सुंदरराजन यांना तेलंगणाचे राज्यपाल करण्यात आले आहे. या राज्यात भाजप लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष नेमून पक्षविस्तारासाठी आणखी जोरकस पावले टाकणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाTamilnaduतामिळनाडू