शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 11:48 IST

Coronavirus : सीएसआयआरने आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीने 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. यात कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते.

ठळक मुद्देभारतात सध्या कोरोना रुग्णाांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नवे कोरोनाची नोंद दिसून येत आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान काउन्सिल फॉर साइन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) च्या सर्व्हेतून कोरोना संसर्ग वाढीच्या कारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट आलेली असतानाही लोकं आजारी पडण्यामागे एक कारण हे देखील असू शकतं की सिरो सर्वेक्षणात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये कोणतीही विशिष्ट अँटी बॉडी अस्तित्वात नसेल, ज्यामुळे ते संसर्गासोबत लढा देतील, असे सर्व्हेमध्ये म्हटले आहे. (new covid outbreak could be due to lack of antibodies in seropositive people csir survey)

सीएसआयआरने आपल्या वीस लॅबोरेटरीच्या मदतीने 10,427 लोकांवर सिरो सर्व्हे केला होता. यात कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्माचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते. हे लोक केंद्रशासित प्रदेशांसह 17 राज्यांमधील निवासी आहेत. 10,427 लोकांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पॉझिटिव्हीटी रेट 10.14 टक्के होता. 

सर्व्हेच्या मुख्य लेखकांपैकी एक असलेल्या शांतनू गुप्ता यांनी सांगितले की, मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये अँटीबॉडीजच्या संख्येत मोठी घट झाली आहे. याच कारणामुळे लोक अधिक प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळत होती. मात्र, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट येण्यास सुरुवात झाली होती. 

सर्व्हेनुसार, पाच ते सहा महिन्यांनंतर सिरो पॉझिटिव्ह लोकांमध्ये महत्त्वपूर्ण न्यूट्रीलायझेशन अॅक्टिव्हिटीची कमी दिसली. CSIR च्या डेटामध्ये अशी माहिती मिळाली, की अँटी-एनसी (न्यूक्लियोकॅप्सिड) अँटीबॉडी वायरल आणि इन्फेक्शनविरोधात दीर्घ काळासाठी सुरक्षा प्रदान करते. आपण आणखी कडक निर्बंध लादल्यास शरिरात न्यूट्रीलायझेशनलची मोठी कमी जाणवू शकते. याच कारणामुळे मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट अधिक झपाट्याने वाढत असल्याचे शांतनू गुप्ता यांनी म्हटले आहे.

भारतात सध्या कोरोना रुग्णाांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नवे कोरोनाची नोंद दिसून येत आहे. सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, देशातील अनेक ठिकाणी केलेल्या अभ्यासानुसार सिरो पॉझिटिव्हिटी रेट 10.14 टक्के येण्याचा अर्थ असा होतो, की भारतात अनेक ठिकाणी सप्टेंबर 2020 मध्ये लोक कोरोनातून बरे झाले होते. विशेषतः ते लोक जे लोकांच्या संपर्कात अधिक येतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. याच कारणामुळे ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली होती. या काळात लोकांच्या शरिरात प्रतिकारशक्ती तयार झाली होती, मात्र ही रोगप्रतिकारशक्ती इतकीही नव्हती की भविष्यातही कोरोनाचा संसर्ग रोखू शकेल.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार ! गेल्या २४ तासांत ३,५२,९९१ नवे रुग्ण, २८१२ जणांचा मृत्यू)

दरम्यान, महाराष्ट्रात मार्चनंतर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे, की या सर्वेक्षणात 24 शहरांमधील लोक सहभागी होते आणि यातून मार्च 2021 च्या आधी देशात पसरलेल्या कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. तसेच, सप्टेंबर २०२० पर्यंत भारतातील बहुतेक लोक कोरोनातून बरे झाले होते आणि त्यांच्यात रोगप्रतिकारशक्तीही तयार झाली होती. हा सर्व्हे जूनमध्ये केला गेला होता. यानंतर देशात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होऊ लागले होते. सोबतच रुग्णसंख्याही कमी होत होती, असेही यामध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत