शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

नव्या १० टक्के आरक्षणाला लगेच सुप्रीम कोर्टात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 06:47 IST

जनहित याचिका; राज्यघटनेचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप

नवी दिल्ली: उच्च जातीतील आर्थिक दुर्बलांना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद करणारे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत बुधवारी संमत झाल्यानंतर लगेच गुरुवारी त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हे आरक्षण न्यायालयीन कसोटीवर टिकण्याविषयी साशंकता व्यक्त होत होतीच. आता त्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी होईल, असे दिसते. महाराष्ट्रातील अ‍ॅड. जयश्री पाटील यांचीही याचिका सादर झाली.

राष्ट्रपतींची मंजुरी व देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची संमती मिळाल्यानंतर हे आरक्षण लागू होईल. परंतु त्याआधी ‘यूथ फॉर इक्वालिटी’ या संस्थेने अ‍ॅड. सेंदिल जगदीशन यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. काही दिवसांत ती न्यायालयापुढे येऊन सुनावणीचे ठरेल. या दुरुस्तीने राज्यघटनेत अनुच्छेद १५(६) व १६(६) यांचा नव्याने अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकांसाठी आरक्षणासह विशेष तरतुदी करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त होईल. हे आर्थिक दुर्बल घटक अनुसूचित जाती व जमातींखेरीज अन्य समाजातील असतील. त्यांच्यासाठी वेगळे १० टक्के आरक्षण ठेवले जाईल. हे आरक्षण विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांतील प्रवेशांनाही लागू होईल. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, यादुरुस्त्या राज्यघटनेच्या मूळ ढांचाच खिळखिळा करणाºया आहेत. संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी ज्याने मूळ ढांचाला धक्का पोहोचेल, अशी दुरुस्ती संसद करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निकाल आहेत.उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्देकेवळ आर्थिक निकषांवर आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने १९९२ मध्येच दिला आहे.समानता व सर्वांना समान वागणूक हे राज्यघटनेचे मूलतत्त्व आहे. त्यामुळे आर्थिक आरक्षण सर्वांसाठी द्यावे लागेल. अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाचे लाभ त्यांच्यातील पुढारलेलेच घेत आले आहेत. आता या आर्थिक निकषांवरील मर्यादित आरक्षणाने त्यांच्यामधील दुर्बलांना दुहेरी फटका बसेल.५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने समानतेचा भंग होईल. घटनेच्या मूलभूत ढांचाला सुरुंग लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये स्पष्ट केले आहे.खासगी विनाअनुदानित शिक्षणसंस्था सरकारी मदत घेत नसल्याने सरकार त्यांच्यावर आरक्षण लादू शकत नाही. गुणवत्तेवर प्रवेश देण्याच्या त्यांच्या हक्कात सरकार हस्तक्षेपही करू शकत नाही, असे न्यायालायच्या घटनापीठानेदोन प्रकरणांत स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय