शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:08 IST

INDIA Vs Bharat Controversy: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, आता पक्षात राहणे अशक्य आहे, असे म्हटले आहे.

INDIA Vs Bharat Controversy: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने भाजपला चितपट करण्यासाठी तयारी सुरू केली असून, भाजपने विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच सध्या देशभरात सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध भारत या वादावर चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता मला पक्षात राहणे शक्य नाही, असे ते म्हणाले. २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाली होती. माझी जीवनतत्त्वे माझे आजोबा शरतचंद्र बोस व त्यांचे धाकटे बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीवर आधारलेली आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माकडे भारतीय म्हणून पाहिले होते. फुटीरतावाद आणि जातीयवादाच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी लढा दिला, असे चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर चंद्र कुमार बोस यांनी थेट भाष्य केले.

चंद्र कुमार बोस नेमके काय म्हणाले?

भारताची जी राज्यघटना आहे, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘इंडिया दॅट इज भारत, अ युनियन ऑफ स्टेट्स’. त्यामुळे भारत आणि इंडिया ही एकच बाब आहे. त्यात कोणताच फरक नाही. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा. हा मुद्दा एकच आहे. त्यामुळे इंडिया की भारत यावरून जो वाद सुरु आहे, तो निरर्थक आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना बोस बंधूंच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, नंतर यासाठी आपणाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही, असा आरोप बोस यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून बोस सातत्याने विविध मुद्दयांवर भाजप आणि पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या धोरणांवर टीका करत होते. आता आपल्याला पक्षात राहणे अशक्य झाले आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाPoliticsराजकारण