शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:08 IST

INDIA Vs Bharat Controversy: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, आता पक्षात राहणे अशक्य आहे, असे म्हटले आहे.

INDIA Vs Bharat Controversy: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने भाजपला चितपट करण्यासाठी तयारी सुरू केली असून, भाजपने विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच सध्या देशभरात सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध भारत या वादावर चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता मला पक्षात राहणे शक्य नाही, असे ते म्हणाले. २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाली होती. माझी जीवनतत्त्वे माझे आजोबा शरतचंद्र बोस व त्यांचे धाकटे बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीवर आधारलेली आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माकडे भारतीय म्हणून पाहिले होते. फुटीरतावाद आणि जातीयवादाच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी लढा दिला, असे चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर चंद्र कुमार बोस यांनी थेट भाष्य केले.

चंद्र कुमार बोस नेमके काय म्हणाले?

भारताची जी राज्यघटना आहे, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘इंडिया दॅट इज भारत, अ युनियन ऑफ स्टेट्स’. त्यामुळे भारत आणि इंडिया ही एकच बाब आहे. त्यात कोणताच फरक नाही. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा. हा मुद्दा एकच आहे. त्यामुळे इंडिया की भारत यावरून जो वाद सुरु आहे, तो निरर्थक आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना बोस बंधूंच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, नंतर यासाठी आपणाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही, असा आरोप बोस यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून बोस सातत्याने विविध मुद्दयांवर भाजप आणि पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या धोरणांवर टीका करत होते. आता आपल्याला पक्षात राहणे अशक्य झाले आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाPoliticsराजकारण