शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:08 IST

INDIA Vs Bharat Controversy: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, आता पक्षात राहणे अशक्य आहे, असे म्हटले आहे.

INDIA Vs Bharat Controversy: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने भाजपला चितपट करण्यासाठी तयारी सुरू केली असून, भाजपने विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच सध्या देशभरात सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध भारत या वादावर चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता मला पक्षात राहणे शक्य नाही, असे ते म्हणाले. २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाली होती. माझी जीवनतत्त्वे माझे आजोबा शरतचंद्र बोस व त्यांचे धाकटे बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीवर आधारलेली आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माकडे भारतीय म्हणून पाहिले होते. फुटीरतावाद आणि जातीयवादाच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी लढा दिला, असे चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर चंद्र कुमार बोस यांनी थेट भाष्य केले.

चंद्र कुमार बोस नेमके काय म्हणाले?

भारताची जी राज्यघटना आहे, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘इंडिया दॅट इज भारत, अ युनियन ऑफ स्टेट्स’. त्यामुळे भारत आणि इंडिया ही एकच बाब आहे. त्यात कोणताच फरक नाही. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा. हा मुद्दा एकच आहे. त्यामुळे इंडिया की भारत यावरून जो वाद सुरु आहे, तो निरर्थक आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना बोस बंधूंच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, नंतर यासाठी आपणाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही, असा आरोप बोस यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून बोस सातत्याने विविध मुद्दयांवर भाजप आणि पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या धोरणांवर टीका करत होते. आता आपल्याला पक्षात राहणे अशक्य झाले आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाPoliticsराजकारण