शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

INDIA-भारत वाद; नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस यांचे प्रथमच भाष्य, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 09:08 IST

INDIA Vs Bharat Controversy: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, आता पक्षात राहणे अशक्य आहे, असे म्हटले आहे.

INDIA Vs Bharat Controversy: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने भाजपला चितपट करण्यासाठी तयारी सुरू केली असून, भाजपने विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपला रामराम केला असून, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच सध्या देशभरात सुरू असलेल्या इंडिया विरुद्ध भारत या वादावर चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता मला पक्षात राहणे शक्य नाही, असे ते म्हणाले. २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून प्रेरणा मिळाली होती. माझी जीवनतत्त्वे माझे आजोबा शरतचंद्र बोस व त्यांचे धाकटे बंधू नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिकवणीवर आधारलेली आहेत. त्यांनी प्रत्येक धर्माकडे भारतीय म्हणून पाहिले होते. फुटीरतावाद आणि जातीयवादाच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी लढा दिला, असे चंद्र कुमार बोस यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले. इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावर चंद्र कुमार बोस यांनी थेट भाष्य केले.

चंद्र कुमार बोस नेमके काय म्हणाले?

भारताची जी राज्यघटना आहे, त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘इंडिया दॅट इज भारत, अ युनियन ऑफ स्टेट्स’. त्यामुळे भारत आणि इंडिया ही एकच बाब आहे. त्यात कोणताच फरक नाही. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत म्हणा. हा मुद्दा एकच आहे. त्यामुळे इंडिया की भारत यावरून जो वाद सुरु आहे, तो निरर्थक आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताना बोस बंधूंच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, नंतर यासाठी आपणाला कोणतेही सहाय्य मिळाले नाही, असा आरोप बोस यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून बोस सातत्याने विविध मुद्दयांवर भाजप आणि पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या धोरणांवर टीका करत होते. आता आपल्याला पक्षात राहणे अशक्य झाले आहे, असे चंद्र कुमार बोस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाPoliticsराजकारण