शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:23 IST

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला दाखवला आरसा.

Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दिल्लीत निधन झाले. 28 डिसेंबर रोजी त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आता त्यांच्या समाधीस्थळावरुन नवा वाद सुरू झाला आहे. या वादावरुन माजी पंतप्रधान दिवंगत पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव, यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेसने नरसिंहरावांना किती मान दिला?मीडियाशी संवाद साधताना मनोहर राव म्हणतात, "काँग्रेसने 20 वर्षे मागे वळून पाहावे. त्यांनी पीव्ही नरसिंह रावांना किती आदर दिला? काँग्रेसने नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी जमीन दिली नाही, त्यांचा एक पुतळाही कधी बांधला नाही, त्यांना भारतरत्नही दिला नाही. काँग्रेसने तर नरसिंह राव यांचे पार्थिव ठेवण्यासाठी पक्ष कार्यालयाचे कुलूपही उघडले नव्हते. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान...संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. मात्र नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही आले नाही. सोनिया गांधी एआयसीसीच्या अध्यक्षा होत्या. त्या हैदराबादला आल्या नाही," अशी टीका त्यांनी केली. 

मनमोहन सरकारमध्ये नरसिंह राव यांना काय मिळाले?मनोहर राव पुढे म्हणतात, "डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात खूप प्रसिद्धी मिळाली, कारण नरसिंह राव यांनी त्यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. या काळात मनमोहन सिंग यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला आर्थिक संकटातून वाचवले. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची जोडी गुरु-शिष्याची जोडी होती. पण, मनमोहन सरकारमध्ये नरसिंह राव यांना काय मिळाले?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप मनमोहन सिंग यांचा आदर करेल"मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनात संवेदना आहेत. त्यांच्या स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. काही औपचारिकता आहेत, ज्या काँग्रेसने पूर्ण केल्या पाहिजेत," असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधी