शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:32 IST

उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : उपग्रहनाशक क्षेपणास्त्र (एसॅट) विकसित केलेल्या देशांत भारताचा समावेश झाल्याबद्दल इस्रो व केंद्र सरकारचे काँग्रेसने अभिनंदन केले आहे. मात्र, या प्रगतीमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांनी बजावलेल्या कामगिरीचाही मोलाचा वाटा आहे, याचीही काँग्रेसने आठवण करून दिली आहे.उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने मिळविलेल्या यशाचे सर्वात जास्त श्रेय कोणत्याही सरकारपेक्षा इस्रोच्या शास्त्रज्ञांना देणे काँग्रेसने पसंत केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, देशात अवकाश संशोधन कार्यक्रमाची सुरुवात १९६१ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. स्व. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत इस्रोने संशोधनात मोठी भरारी घेतली होती. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत हाती घेण्यात आला. आज तो यशस्वी ठरला आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र विकसित केल्याबद्दल डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेन्ट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ)चे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे. मात्र या क्षेपणास्त्राची चाचणी मिशन शक्ति मोहिमेद्वारे यशस्वी झाल्यानंतर त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या थाटात दूरदर्शनवर घोषणा केली त्या अविष्काराची ‘जागतिक नाट्यदिनानिमित्त अभिनंदन' असा उल्लेख करून राहुल गांधी यांनी खिल्ली उडविली आहे.

मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न : अखिलेश यादवदेशातील मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तिच्या यशानिमित्त दूरचित्रवाहिनीवरून एक तास केलेल्या भाषणातून केले असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. बेरोजगारी, ग्रामीण भागातील दुरवस्था, महिलांची सुरक्षितता या गंभीर प्रश्नांबद्दल मोदींनी मौन पाळले असेही ते म्हणाले.

मिशन शक्ती यशाचा मोदींकडून राजकारणासाठी वापर : मायावतीउपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र विकसित केल्याच्या यशाचा नरेंद्र मोदी राजकारणासाठी व लोकसभा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. मोदींच्या या कृतीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीMission Shaktiमिशन शक्ती