शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

नीट-यूजी; विश्वासार्हता भंगल्याचे आढळले नाही, म्हणून परीक्षा रद्द केली नाही: सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 06:25 IST

ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेची विश्वासार्हता भंग करण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे आम्ही यंदा ५ मे रोजी झालेली ही परीक्षा रद्द केली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने ही परीक्षा वादग्रस्त ठरली होती. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात २३ जुलै रोजी निकाल दिला होता. त्यात त्यांनी ही परीक्षा रद्द का केली नाही, त्या कारणांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. या निकालपत्रात म्हटले आहे की, नीट-यूजी परीक्षा घेणाऱ्या यंदा पाटणा व हजारीबाग या दोन ठिकाणीच नीट-यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आढळले. अन्य ठिकाणी अशा घटना घडल्या नाहीत. हे लक्षात घेऊन आम्ही ही परीक्षा रद्द केली नाही.

‘लाखो विद्यार्थ्यांना त्रास झाला असता’

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-यूजी परीक्षेला यंदा २३ लाख विद्यार्थी बसले होते. प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी तसेच परीक्षेच्या विश्वासार्हतेला धक्का लावण्याकरिता व्यापक स्तरावर पद्धतशीर प्रयत्न झाले नव्हते असे आढळून आले आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश दिला असता तर लाखो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीक