शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

"पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट"; CWC बैठकीत सोनिया गांधींनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:18 IST

Congress CWC : नुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली

ठळक मुद्देनुकतेच जाहीर करण्यात आले ५ विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल. कांग्रेसला करावा लागला पराभवाचा सामना

नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, खराब कामगिरीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कागगिरी चांगली करण्याचं सदस्यांना आवाहन केलं आहे. तसंच निवडणुकांच्या निकालांवरून हे स्पष्ट होतंय की काँग्रेसला सुधारणांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला पुन्हा पराभवाचा फटका बसला आहे. "आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. "केरळ आणि आसाममधील विद्यमान सरकारला सत्तेतून काढून टाकण्यासाठी आपण का अयशस्वी झालो आणि बंगालमध्ये आपले खाते का उघडले नाही, हे आम्हाला समजून घेतले पाहिजे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. २ जानेवारीला आपली बैठक झाली तेव्हा आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक निश्चित केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. महासाथीवरून साधला निशाणायावेळी देशातील कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीबद्दल सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "राष्ट्रीय इच्छाशक्ती दाखविण्यासाठी व  संकल्प करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे. प्रत्येकाला लस दिली गेली पाहिजे आणि लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने उचलावा," असंही सोनिा गाँधी यावेली म्हणाल्या. तसंच त्यांनी यावेळी मागील वेळच्या बैठकीचा उल्लेख केला."गेल्या वेळी १७ एप्रिल रोजी आपली भेट झाली होती. यानंतर चार आठवड्यातच कोरोनाची परिस्थिती भयावह झाली. सरकारचा नाकर्तेपणा समोर आला आणि वैज्ञानिकांचा सल्लाही जाणूनबुजून दुर्लक्षित केला गेला," असंही त्या म्हणाल्या.महासाथीबाबत निष्काळजीपणा"मोदी सरकारनं कोरोना महासाथीबाबत निष्काळजीपणा केला आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमांना जाणूबुजून परवानगी दिली. त्याची किंमत आज देशाला भोगावी लागत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. लसीकरण मोहीमही अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. त्याचा विस्तार हव्या त्या गतीनं केला जात नाही," असंही सोनिया गांधी यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक