शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील”; सुप्रिया सुळेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 19:21 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी काहीतरी मार्ग काढण्याचे आश्वासन अमित शाहांनी दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही दिले आहे. यानंतर अखेर अमित शाह (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान यासह शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांबाबत तक्रार केली, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. अमित शाह यांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यावर मार्ग काढतील

अमित शाहांशी झालेल्या भेटीबाबत अधिक माहिती देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून त्यांनी त्यामधून मार्ग काढावा, अशी विनंती अमित शाहांना केली आहे. यावर, तसेच गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे यात केंद्राचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत. राज्याच्या हितासाठी कोणतीही कृती करताना ते दिसत नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी भाष्य सुद्धा केले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. महाराष्ट्राचा, शिवरायांचा, फुले दाम्पत्याचा अपमान होतो तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठराखण करण्याचे काम करतात, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAmit Shahअमित शाह