शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दोन वर्षांत नक्षलवाद संपुष्टात, महाराष्ट्रासह प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 06:17 IST

दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

नवी दिल्ली : दोन वर्षांत नक्षलवादाचे देशातून पूर्णपणे उच्चाटन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. नक्षलवाद प्रभावित राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

आढावा बैठकीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि झारखंडचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या मंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

गृह मंत्रालयाने दिली आकडेवारी...

नक्षलग्रस्त राज्यांमध्ये २०१० च्या उच्चांकाच्या तुलनेत २०२२ मध्ये हिंसक घटना ७७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

२००४ ते २०१४ दरम्यान नक्षलवाद संबंधित १७,६७९ घटना आणि ६,९८४ मृत्यू झाले. याउलट २०१४ ते २०२३ (१५ जून २०२३ पर्यंत) नक्षलवादा संबंधित ७,६४९ घटना आणि २०२० मृत्यू झाले.

शहरी नक्षलवाद’ रोखण्यास यंत्रणा उभारा : शिंदे

विकास योजनांमुळे नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा चांगलाच बदलत आहे, परंतु शहरी नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवाद बैठकीत व्यक्त केली. ‘दरवर्षी कोट्यवधी रुपये नक्षलवाद्यांना पाठवले जातात. हा पैशाचा व्यवहार थांबवण्यासाठी आणि त्याची कसून चौकशी करण्यासाठी, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तिकर विभाग आणि वित्तीय गुप्तचर युनिटचा एक संयुक्त गट तयार केला पाहिजे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा