शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 15:08 IST

Amit Shah : छत्तीसगडचा एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे.

नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे नक्षलवादावर मोठे विधान समोर आले आहे. येत्या दोन-तीन वर्षांत देशातील नक्षलवादाची समस्या संपेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, छत्तीसगडचा एक छोटा भाग वगळता संपूर्ण देश या धोक्यापासून मुक्त झाला असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे.

पशुपतीनाथ ते तिरुपती या तथाकथित नक्षल कॉरिडॉरमध्ये नक्षलवाद्यांची उपस्थिती नाही, असे अमित शाह म्हणाले. देशातून नक्षलवाद संपत आहे. कधीकाळी काही लोक पशुपतीनाथ ते तिरुपती या नक्षल कॉरिडॉरबद्दल बोलत असत. आता झारखंड पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. बिहार पूर्णपणे मुक्त झाला. ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशही पूर्णपणे मुक्त झाले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

छत्तीसगड पूर्णपणे मुक्त झालेला नाही आणि तेथे काही भागात नक्षलवादी अजूनही सक्रिय आहेत. कारण गेल्या पाच वर्षांपासून राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. भाजपा सरकारने पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता हाती घेतल्यापासून छत्तीसगडला नक्षलमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. आमचे सरकार आल्यापासून (छत्तीसगडमध्ये) जवळपास १२५ नक्षलवादी मारले गेले आहेत, ३५२ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, १७५ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. आजची (२५ मे) आकडेवारीही मोजली तर जवळपास २५० जणांनी आत्मसमर्पण केले आहे. इथे मी फक्त गेल्या पाच महिन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलत आहे असे म्हणत पुढील दोन किंवा तीन वर्षात देश नक्षल समस्येपासून मुक्त होईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

दरम्यान, छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये नक्षलवाद्यांच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. आतापर्यंतच्या इतिहासात एकाच चकमकीत मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ही सर्वाधिक संख्या होती. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड