शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे; पण काँग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 19:48 IST

Navjot Singh Sidhu: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा मागे घेत आहे, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

चंडीगड: गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधील राजीनामा देऊन नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत. यातच आता नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आपला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. यामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. 

नवज्योत सिंग सिद्धू यांनी कारभार स्वीकारण्याची अट घातली आहे. नवीन एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन, असे सिद्धू यांचे म्हणणे आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी सरकारच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामा दिला होता. चंडीगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवज्योत सिंग सिद्धू यांनी याबाबतची माहिती दिली. 

मी माझा राजीनामा मागे घेत आहे

मी माझा राजीनामा मागे घेत आहे. नवे एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा मागे घेत आहे, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, पंजाबचे पोलीस महासंचालक, आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी, यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी २८ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पंजाबच्या विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. जरी राजीनामा दिला असला तरीदेखील काँग्रेससाठी यापुढेही काम करतच राहील, असे सिद्धू यांनी या पत्रात म्हटले होते. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिखांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये गोळीबार झाला होता. गोळीबार प्रकरणी सिद्धू यांनी त्यांच्याच पक्षाचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर आरोप केले होते. नवे मुख्यमंत्री आल्यानंतरही ५० दिवस उलटूनही गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणात आणि ड्रग्स प्रकरणात कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच पोलीस महासंचालक आणि अ‍ॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबcongressकाँग्रेस