शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती , 14 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:57 IST

देशभरात ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, दरडीही कोसळल्या आहेत.

नवी दिल्ली - देशभरात ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून, दरडीही कोसळल्या आहेत. ईशान्य भारतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनच्या तडाख्याने केरळमध्ये प्रचंड नुकसान झाले तर दिल्लीत आलेल्या धुळीच्या वादळाने विमान वाहतूकही कोलमडली आहे. उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाने १० जणांचा बळी घेतला असून, एकूण देशभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशात 10 बळीलखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा वादळाने कहर मांडला असून, बुधवारी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व विजा पडल्याने १0 जण मरण पावले असून, २८ जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सीतापूर जिल्ह्यातील ६ जण असून, गोंडा जिल्ह्यातील तीन व फैजाबादच्या एकाचा समावेश आहे. फैजाबाद व लखनऊमध्ये धुळीच्या वादळाच्या तडाख्याची शक्यता हवामान विभागाने मंगळवारीच व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशात आजही अनेक भागांत धुळीचे वादळ असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.केरळात चौघांचा बळीकोळीकोड : केरळच्या कोळीकोड व मल्लापूरम जिल्ह्यांत बुधवारपासून पावसाने हैदोस घातला असून, या पावसामुळे काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले आणि तर काही ठिकाणी पूर्णत: खचले आहेत. भूस्खलन व दरडी कोसळण्याचे प्रकारही झाले असून, त्यात ४ जण मरण पावले आहेत आणि ८ जण बेपत्ता आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.इराण व अफगाणच्या धुळीने दिल्ली, राजस्थानात वादळइराण व अफगाणिस्तानातील प्रचंड धुळीच्या वादळाचे परिणाम राजस्थान व राजधानी दिल्लीत जाणवत आहेत. तापलेली जमीन व वेगाने वाहणाऱ्या वाºयासोबत उडणारे धुलीकण यांमुळे दिल्लीत हवा धोकादायक बनली आहे.धुलीकण १० मानकांपैकी ९ पट जास्त असून ते धोकादायक पातळी ओलांडून ८३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले आहे. हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी हा धुळीचा स्रोत इराण, दक्षिण अफगाणिस्तान व राजस्थान असल्याचे सांगितले आहे.हरयाणाच्या रोहतक व राजस्थानच्या जयपूरमध्ये हवा खूपच प्रदूषित झाली आहे. या भागांत पाऊस पडेपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.इशारा : देशाच्या दक्षिण, मध्य व पूर्व भागांत पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदिगढ, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागांत येते तीन दिवस २५ ते ३० किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. येथील हवामान १८ जूनपर्यंत कोरडेच राहील.

 

ईशान्य भारतात पावसाचा हाहाकारगुवाहाटी : ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा, मणिपूर व अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी हेलिकॉप्टरमधून पूरस्थितीची पाहणी केली. आसाम, मणिपूर व त्रिपुरामध्ये एनडीआरएफची पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. आगरतळा, गुवाहाटी शहरांत सर्वत्र पाणी साचले असून, रस्तेही पूर्णत: पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे रुळांवर पाणी आहे आणि काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे.आसामच्या लामडिंग-बदरपूर हिल स्टेशन परिसरात मुसळधार पावसाने भूस्खलन झाले आहे. यामुळे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. त्रिपुरामध्ये पावसामुळे आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. हजारो लोकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देव यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे.इशारा : त्रिपुरा व दक्षिण आसामच्या अनेक भागांमध्ये येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या भागात अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.पूरस्थिती : आसाममधील गोलाघाट, कारबी अंगलोंग ईस्ट, कारबी अंगलोंग वेस्ट, विश्वनाथ, करीगंज आणि हैलाकांडी भागात पूरस्थिती आहे.50हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पावसाने अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या