शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

परदेशी वस्तूंना आता बाय बाय; भारतात पॅरामिलिट्री कँटीनमध्ये मिळणार फक्त स्वदेशी उत्पादनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 17:23 IST

या विदेशी उत्पादनांची जागा आता कॅन्टीनमधील स्वदेशी उत्पादनं घेणार आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशी उत्पादनांवर जोर देण्याचे आवाहन केले होते. त्याचाच प्रत्यय आता दिसू लागला आहे. केंद्रीय पोलीस कल्याण भांडारातून 1000 हून अधिक विदेशी उत्पादनांची विक्री बंद करण्यात आली आहे. यात मायक्रोवेव्ह ओव्हनपासून पादत्राणे आणि टॉमी हिलफिगर शर्ट सारख्या ब्रांडेड उत्पादनांसह 1000हून अधिक आयात करण्यात आलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. ही परदेशी उत्पादने यापुढे केंद्रीय पोलीस कल्याण भांडार (केपीकेबी)मध्ये उपलब्ध होणार नाहीत. या विदेशी उत्पादनांची जागा आता कॅन्टीनमधील स्वदेशी उत्पादनं घेणार आहेत.हा निर्णय देशभर अर्धसैनिक (अर्धसैनिक दल) कँटीन चालविणा-या संघटनेने घेतला आहे. या कॅन्टीनमध्ये १ जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकली जातील. केपीकेबीच्या सर्व कॅन्टीनमध्ये केवळ मेड इन इंडिया उत्पादने विकली जातील, असं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विधानानंतर  हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय परदेशातून माल आयात करणार्‍या बर्‍याच कंपन्यांची उत्पादनेही कॅन्टीनने हटविली आहेत. तसेच केपीकेबीने काही कंपन्यांची उत्पादने कॅन्टीनमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी त्यांच्याकडे माहिती मागितलेली असतानाही ती पुरवली नाही. केपीकेबीने आता सर्व उत्पादनांना तीन विभागांमध्ये विभागले आहे. यात प्रथम श्रेणी - पूर्णपणे शुद्ध उत्पादित उत्पादनांचा समावेश आहे, दुसर्‍या प्रकारात - आयातीत कच्चा माल, परंतु उत्पादनांमध्ये तयार केलेली उत्पादने आणि तिसर्‍या श्रेणीतील - निव्वळ आयात उत्पादनांचा समावेश आहे. केंद्रीय पोलीस कॅन्टीन सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्समध्ये काम करणा-या सुमारे दहा लाख जवानांच्या जवळपास 50 लाख कुटुंबांना ही उत्पादने पुरवते. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच घोषणा केली होती की, सीआरपीएफ आणि बीएसएफ सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) सर्व कॅन्टीन 1 जूनपासून केवळ स्वदेशी उत्पादने विकतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादने निवडण्याचे व स्वावलंबी राहण्याचे आवाहन केल्यानंतर गृहनिर्माण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. शहा यांनी देशातील नागरिकांना देशात बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले व इतरांनाही असे करण्यास उद्युक्त केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी