शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

देशाची वाटचाल अराजकतेकडे; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 11:46 IST

भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पुन्हा एकदा पक्षावर टीका केली

लखनऊ: देश अराजकतेकडे चालला आहे, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे अराजक नाही, तर काय आहे?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदी सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमधील खासदार असलेल्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या पक्षावर जोरदार टीका केली. 'कधी म्हटलं जातं की, आम्ही भारताच्या संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. कधी म्हटलं जातं की, आम्ही आरक्षण काढून टाकू. तर कधी, भारताचं संविधान अशाप्रकारे संपवू की ते असून-नसून सारखंच असेल, अशीही विधानं केली जातात. देशाचं संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील,' असं सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं. मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन झालेल्या वादातही सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपाचे नेते मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात विधानं करत असताना फुले यांनी जिना यांचं कौतुक केलं होतं. जिना हे महापुरुष होते आणि कायम राहतील, असं त्यांनी म्हटलं होतं. 'स्वातंत्र्य लढ्यात जिना यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल, तिथे त्यांचं छायाचित्र लावायला हवं,' असं त्या म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेBJPभाजपाDalit assaultदलितांना मारहाण