शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देशाची वाटचाल अराजकतेकडे; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 11:46 IST

भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी पुन्हा एकदा पक्षावर टीका केली

लखनऊ: देश अराजकतेकडे चालला आहे, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे अराजक नाही, तर काय आहे?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदी सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमधील खासदार असलेल्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या पक्षावर जोरदार टीका केली. 'कधी म्हटलं जातं की, आम्ही भारताच्या संविधानात बदल करण्यासाठी आलो आहोत. कधी म्हटलं जातं की, आम्ही आरक्षण काढून टाकू. तर कधी, भारताचं संविधान अशाप्रकारे संपवू की ते असून-नसून सारखंच असेल, अशीही विधानं केली जातात. देशाचं संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील,' असं सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं. मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन झालेल्या वादातही सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपाचे नेते मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात विधानं करत असताना फुले यांनी जिना यांचं कौतुक केलं होतं. जिना हे महापुरुष होते आणि कायम राहतील, असं त्यांनी म्हटलं होतं. 'स्वातंत्र्य लढ्यात जिना यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल, तिथे त्यांचं छायाचित्र लावायला हवं,' असं त्या म्हणाल्या होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेBJPभाजपाDalit assaultदलितांना मारहाण