शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता; कमल हसनचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:16 IST

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं आहे

अर्वाकुरची - स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादीहिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं आहे. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अर्वाकुरची येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 

अर्वाकुरची येथे येत्या 19 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी कमल हसन यांच्या राजकीय पक्षाचा उमेदवार उभा आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी कमल हसन अर्वाकुरची येथे आले होते. त्यावेळी बोलताना कमल हसन म्हणाले की, पहिला हिंदूदहशतवादी नथुराम गोडसे होता. या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे मी हे बोलत नाही तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्याच्यासमोर उभं राहून मी हे सांगतोय. 

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. त्याच्यापासून दहशतवाद सुरु झाला. मी गांधींचा चाहता आहे मी त्यांच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी आलो आहे. मी खरा भारतीय आहे. आणि कोणत्याही खऱ्या भारतीयाची देशात शांती आणि देशात समानता राखण्याची इच्छा असते असं यावेळी कमल हसन यांनी सांगितले. तसेच कोणताही खरा भारतीय नेहमी देशाचा झेंडा म्हणून तिरंग्याला पसंती देतो. आणि कायम देशाचा झेंडा तिरंगा राहील अशी त्याची इच्छा आहे असंही त्यांनी सांगितले. 

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू दहशतवादावरून काँग्रेसवर टीका केली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करून समस्त हिंदूंचा अपमान केला असून पाच हजार वर्षांच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे पाप केले आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली होती. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्होटबँक वाचविण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द उच्चारून समस्त हिंदूंचा अपमान केला. 

स्वामी असीमानंद यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर टीका करण्यासाठी हिंदू दहशतवादाचं कार्ड खेळण्यात आलं. असीमानंदाचा सुटका झाल्याने काँग्रेसचे षडयंत्र उघड झाले आहे. त्यामुळे देशातील जनतेने काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याचंही काँग्रेस जाणून आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेसचे नेते मैदान सोडून पळत आहेत. ज्यांनी हिंदू दहशतवादाचा प्रचार केलाय, ते लोक घाबरले आहेत. त्यामुळे याठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी आहे, अशा मतदारसंघातून हे लोक निवडणूक लढवत आहेत असं सांगून राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पंतप्रधान मोदींनी टीका केली होती.  

टॅग्स :ElectionनिवडणूकKamal Hassanकमल हासनNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदूterroristदहशतवादीNathuram Godseनथुराम गोडसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक