शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

नासाकाचे कामगार आर्थिक अडचणीत

By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणी

थकीत वेतन देण्याची युनियनची मागणीनाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या ४५ महिन्यांचे वेतन थकल्याने आणि संचालक मंडळाची दोन वर्षांपूर्वीच मुदत संपल्याने कामगार प्रचंड आर्थिक विंवचनेत सापडले असून, एका कामगाराचा उपचाराअभावी, तर दुसर्‍या कामगाराचा कर्जबाजारीपणे आत्महत्त्या केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नाशिक साखर कामगार युनियनने केला आहे.यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकार्‍यांनी नासाकाच्या कामगारांचे ४५ महिन्यांचे पगार मिळणे बाकी आहे. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना एक रुपयादेखील कारखान्याकडून आतापर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कामगारांचे जीवन संकटात सापडले आहे. कै. अशोक रामचंद्र फड या कर्मचार्‍यास दवाखान्याच्या उपचारास पैसे नसल्याने मृत्यूस सामोरे जावे लागले आहे, तर १७ मार्च रोजी विठ्ठल शंकर नाठे यांनी आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. कामगारांची अशी अवस्था असताना ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस कारखाना बंद असल्याने गाळपास कोठे पाठवावा, अशी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नासाका कामगारांचे आर्थिक विवंचनेतून काही बरे वाईट झाल्यास त्यास नासाका संचालक मंडळ व शासन जबाबदार राहणार असल्याचा आरोप नाशिक साखर कारखाना कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. यावेळी विष्णुपंत गायखे, विनोद नाठे, शंकरराव रोकडे, सुरेश कुमट, विष्णुपंत गायधनी, चिंतामण विंचू आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)