शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

"शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत": नरेंद्र सिंह तोमर

By देवेश फडके | Published: January 31, 2021 7:48 PM

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देशरद पवार भूमिका बदलतील - नरेंद्र सिंह तोमरकृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही - नरेंद्र सिंह तोमरशरद पवार अनुभवी राजकारणी आहेत - नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार एक अनुभवी राजकारणी आहेत आणि माजी केंद्रीय कृषीमंत्रीही आहेत. शेतीशी निगडीत मुद्दे आणि निराकरण याची शरद पवार यांना उत्तम माहिती आहे, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

शरद पवार यापूर्वी कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. मात्र, आता शरद पवार ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे. सर्व काही माहिती असूनही शरद पवारांसारखे अनुभवी नेते शेतकऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत, असा दावा नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.

शरद पवार भूमिका बदलतील

शरद पवार यांच्याकडे आता योग्य माहिती आली आहे. त्यामुळे ते यापुढे आपली भूमिका बदलतील आणि देशातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे आणि लाभ सांगतील, असा मला विश्वास आहे, असेही तोमर यांनी म्हटले आहे. 

"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी  

कृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. आपल्या राज्याबाहेर शेतकऱ्यांना माल विकता येणार असून, त्याची त्यांना चांगली किंमतही मिळेल. सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही. नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. याउलट, अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असेही तोमर यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाजार समित्या यांची व्यवस्था नवीन कृषी कायद्यांमुळे कमकुवत होईल, असा दावा शरद पवार यांनी केला. आमच्या कार्यकाळात विशेष बाजार समित्या स्थापन करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता, जेणेकरून शेतकरी आपले उत्पादन आणि तयार शेतमाल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळू शकेल आणि शेतकरी हितासाठी आताची बाजार प्रणाली मजबूत करण्यासाठी आमच्याकडून सावधगिरी बाळगण्यात आली, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसagricultureशेती