शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रयतेचा राजा, जाणता राजा... नरेंद्र मोदींचा शिवरायांना मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 11:24 IST

स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.

नवी दिल्ली- स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यासंदर्भात मोदींनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मोदींनी शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व बहुआयामी होतं. त्यांनी सुशासन आणि प्रशासन एकसंध करून हिंदुस्तानाच्या इतिहासाचा नवा अध्याय लिहिला. आणि स्वतःची योग्यता आणि क्षमतेच्या आधारावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. संघर्षमय जीवन असतानाही त्यांनी असाध्य असं कार्य साध्य करून दाखवलं. त्याचं व्यक्तित्व अद्वितीय आहे. शिवाजी महाराज हे नेहमी सत्य आणि न्यायासाठी लढत राहिले. देशभक्ती त्यांच्यात भिनलेली होती. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत, असंही मोदींनी लिहिलं आहे. मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या हवाला देत शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ‘प्रभू रामांनी लहानसहान लोकांना, वानरांना एकत्रित करून सेना बनवली आणि युद्धात विजय मिळवला, तशाच प्रकारे शिवाजी महाराजांची संघटन कौशल्याच्या जोरावर शेतकरी आणि मावळ्यांना एकत्र करून युद्धासाठी सज्ज केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी महाराज एक फार हुशार सैन्य रणनीतिकार होते. ते पहिले भारतीय शासकांमध्ये पहिले असे शासक होते, ज्यांना नौसेनेचं महत्त्व चांगलंच कळालं होतं. त्यासाठीच त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांमध्ये नौसेना स्थापन केली होती. रत्नागिरीमध्ये त्यांनी जहाजांची डागडुजी करण्यासाठी किल्ल्याची निर्मिती केली होती. तसेच त्यांनी सैन्याचं महत्व ओळखून सैन्य 2 हजारांहून वाढवून 10 हजार केलं होतं. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. वयाच्या16व्या वर्षी तोरणा सर करून ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज