शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या काळातील तणाव दूर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना देणार धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 13:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुस्तकाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

मुंबई- 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधतात. महत्त्वाच्या मुद्द्यांपासून ते परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यापर्यंत सगळंच मोदी मन की बातमध्ये बोलतात. देशातील लोकांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुस्तकाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘एक्झाम वॉरिअर्स’ असं या पुस्तकाचं नाव असून या पुस्तकांच्या माध्यमातून परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा हाताळावा याचे धडे ते  विद्यार्थ्यांना देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं हे पुस्तक ३ फेब्रुवारीला प्रकाशित होईल. इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत हे पुस्तक उपलब्ध होणार आहे. परीक्षेच्या काळात मुलांच्या मनावर ताण असतो. जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या अपेक्षांचं ओझाखाली मुलं दबून जातात. परीक्षांचा ताण सहन न झाल्यानं काही विद्यार्थ्यांना नैराश्य येते. कधी कधी टोकाचं पाऊल उचलत ही मुलं आपलं आयुष्य संपवतात. अशा वेळी तणावाला कसं सामोरं जावं, तणाव नियंत्रण कसं करावं याबद्दलचे वेगवेगळे उपाय नरेंद्र मोदी या पुस्तकाच्यामाध्यमातून सांगणार आहेत. मोदींनी लिहिलेलं पुस्तक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. 

पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. पेंग्विनद्वारे या पुस्तकाचं मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आलं आहे. यात लहान मुलांच्या चित्रासोबत नरेंद्र मोदींचंही चित्र दाखवण्यात आलं आहे. विद्यार्थी हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणूनच हा विषय मी लिखाणासाठी निवडला’ असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे हे शिकवण्यापेक्षा ज्ञान कसं आत्मसात करता येईल याबद्दल देशाच्या नव्या पिढीला यातून मार्गदर्शन मिळेल अशी आशा प्रकाशन संस्थेनं व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाStudentविद्यार्थी