शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकरी, सर्जिकल स्ट्राईक अन् राम मंदिराचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल, म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 29, 2020 18:46 IST

मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते.

ठळक मुद्देमोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. पंतप्रधान म्हणाले, हे लोक आधी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराला विरोध करत होते आणि नंतर भूमिपूजनाला विरोध करू लागले.प्रत्येक बदल्या तारखेबरोबर विरोधासाठी विरोध करणारे हे लोक अप्रासंगिक होत चालले आहेत - मोदी

नवी दिल्ली - विरोधक किमान आधारभूत किंमतीसंदर्भात (एमएसपी) शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप करत, देशात एमएसपीदेखील राहणार आणि शेतकऱ्यांना कोठेही आपला माल विकण्याचा अधिकारही राहणार, असे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याच वेळी मोदींनी सर्जिकल स्ट्राईक आणि राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरही जबरदस्त हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदींनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'नमामी गंगे'अंतर्गत उत्तराखंडमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, मुनीच्या रेती आणि बद्रीनाथमध्ये एसटीपी आणि गंगा संग्रहालयाचे दिल्ली येथून डिजिटल लोकार्पण केले. यानंतर बोलतांना मोदींनी कृषी विधेयकांवरून विरोधकांवर हल्ला चढवला.

शेतकरी -विरोधकांचे नव न घेता मोदी म्हणाले, ''स्वामीनाथन आयोगाने म्हटल्याप्रमाणे आमच्या सरकारने एमएसपी लागू करण्याचे काम केले. मात्र, हे एमएसपीवरच शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. देशात एमएसपीदेखील राहणार आणि शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकण्याचे स्वातंत्र्यदेखील असेल.''

जनधन - पंतप्रधान मोदी म्हणाले संपूर्ण देशाने पाहिले आहे. जनधन बँक खात्यामुळे लोकांना कशा प्रकारे लाभ मिळाला. जेव्हा हे काम आमच्या सरकारने सुरू केले, तेव्हा  हेच लोक याला विरोध करत होते. देशातील गरिबाचे बँक खाते उघडावे, त्यांनाही डिजिटल देवाणघेवाण करता यावी, याला या लोकांनी नेहमीच विरोध केला आहे.

योग दिवसपंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या पुढाकाराने जेव्हा संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत होते, तेव्हा भारतातच बसलेले हे लोक त्याला विरोध करत होते. जेव्हा सरदार पटेलांच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण होत होते, तेव्हाही हे लोक त्याला विरोध करत होते. आजपर्यंत यांचा एकही नेता स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी गेला नाही.

सर्जिकल स्ट्राइक -मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. या लोकांनी देशासमोर आपला हेतू स्पष्ट केला आहे.

राम मंदिर -मोदी म्हणाले, गेल्या महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिराचे भूमीपूजन झाले. मात्र, हे लोक आधी सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराला विरोध करत होते आणि नंतर भूमिपूजनाला विरोध करू लागले. त्यामुळे प्रत्येक बदल्या तारखेबरोबर विरोधासाठी विरोध करणारे हे लोक अप्रासंगिक होत चालले आहेत, असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान