शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

... त्यांना मोदींनीच सांगितलं असावं, शेवाळेंच्या गौप्यस्फोटावर राऊतांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 20:07 IST

उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. शिवसेना खासदारांनी संजय राऊत यांच्यामुळेच युतीची चर्चा फिस्कटल्याचे सांगितले. तसेच, युतीसंदर्भात मौठा गौप्यस्फोटही केला होता. आता, या गौप्यस्फोटावर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडीवेळीही सर्वांना विश्वासात घेतलं होतं, त्यावेळी या सर्वांनी निर्णयाचं स्वागत केलं होतं. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली, त्यातील बराचसा भाग उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितला होता. ठाकरे कुटुंब आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे, जो कोणी हा गौप्यस्फोट केलाय, त्यांना अधिक माहिती असेल. किंवा मोदींनीच त्यांना ही माहिती सांगितली असेल, असे म्हणत संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या गौप्यस्फोटावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

भाजपामुळेच युती तुटली

शिवसेना-भाजपा युती तुटण्यास शिवसेना जबाबदार नाही. सन 2014 आणि 2019 मध्ये युती ही भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठं होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टिका झाली. त्यावेळी, हे सर्व खासदार कुठे होते. त्यांनी या टिकेला प्रत्युत्तर का दिले नाही. पण, या टिकाकारांवर आम्ही तुटून पडलो, आम्ही पक्षाची भूमिका मांडली, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.  

राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे स्वत: भाजपासोबत युतीसाठी आग्रही होते. पण, खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला असा घणाघाती आरोप राहुल शेवाळे यांनी केला. विशेष म्हणजे युतीसाठी उद्धव ठाकरे जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तासभर चर्चाही केली होती. मात्र, पुढच्या जुलै महिन्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे, ही बोलणी पुढे सरकलीच नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी