शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"मोदीजी आणि ट्रम्प मित्र आहेत, मग हे..."; अमेरिकेतून बाहेर पाठवलेल्या स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन प्रियांका गांधींनी निशाणा साधला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:18 IST

अमेरिकेतून हद्दपार केलेल्या ११४ भारतीयांबाबत आज संसदेत मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हातपायात बेड्या बांधलेल्या होत्या, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

काल अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकन सी-१४७ विमानाने भारतात आली. या विमानात १०४ भारतीय होते. या प्रकरणावरुन आज संसदेत मोठा गोंधळ झाला, विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरले. बुधवारी अमेरिकन आर्मीचे विमान या भारतीयांना घेऊन अमृतसरला पोहोचले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हातपायात बेड्या बांधलेल्या होत्या, असा काँग्रेसचा दावा आहे. यावरुन आता काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांमध्ये १९ महिला, १३ अल्पवयीन; डबल पैसे खर्च करुन सोडून गेले

खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, "अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे खूप चांगले मित्र आहेत असे अनेक वेळा बोलले जात होते. पंतप्रधान मोदींनी हे का होऊ दिले? त्यांना परत आणण्यासाठी आपण आपले विमान पाठवू शकलो नसतो का? लोकांसोबतअसेच वागले जाते का? त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून परत पाठवले जाते का? परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, असा निशाणा प्रियांका गांधी यांनी केला. 

दरम्यान, या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "ज्या पद्धतीने हे घडले त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांना त्या लोकांना हद्दपार करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे, पण त्यांना अचानक लष्करी विमानात हातकड्या घालून पाठवणे हा भारताचा अपमान आहे, भारतीयांच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे, असंही थरुर म्हणाले.

अमेरिकेने 104 अवैध भारतीयांना पाठविले घरी

अमेरिकेने बुधवारी अवैध प्रवाशांविरुद्धच्या धोरणा अंतर्गत १०४ अवैध भारतीय स्थलांतरितांना जबरदस्तीने त्यांच्या देशातून हाकलून दिले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर २ वाजता अमृतसर येथील हवाई दलाच्या हवाई तळावर उतरले. या १०४ लोकांत त्यांची काही कुटुंबे आणि ८-१० वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश होता.

अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी करण्यात आली. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

अमेरिकन हवाई दलाचे विमान सुमारे साडेतीन तासांनंतर परतले. त्यानंतर पंजाबमधील लोकांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. मात्र, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंडीगडमधील लोकांचे परतणे अद्याप बाकी आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी