शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, नाना पटोलेंचा खणखणीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 15:13 IST

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून काँग्रेसला डिवचण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. याबद्दल नाना पटोलेंना विचारले असता, मी सामना वाचत नाही, सामनावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हटले आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे. अदानींनी घेतलेल्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेसने थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटले आहे. तसेच, अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकार आणि गुजराती उद्योजकांवर निशाणा साधला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे मुख्यालय मुंबईहून अहमदाबादला हलविल्याबद्दल नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इंस्टीट्यूट गुजरातला नेले जात आहेत. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून काँग्रेसला डिवचण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. याबद्दल नाना पटोलेंना विचारले असता, मी सामना वाचत नाही, सामनावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हटले आहे.    

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात आहे. त्यासाठी येथील उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातमध्ये नेली जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता 'एएएचएल'चे मुख्यालय देखील गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन, काँग्रेस आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सचिन सावंत यानीही साधला निशाणा

"मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असेच गुजरातला नेले गेले," असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAdaniअदानीGujaratगुजरात