शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Nana Patole: निवडणुकीतील यशाबद्दल प्रियंका गांधींचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:56 IST

भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे.

मुंबई - देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तर प्रदेशातील यशाबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे. 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत, हेच सांगायचं आहे. त्यासाठी, काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकारी आज होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशसारख्या खाली मैदानात मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवली. त्यामुळे, त्यांच्या कामाचं कौतूक करायचं आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या बैठकीत मांडायचा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी चांगला स्कोप कशाप्रकारे मिळवता येईल, याबाबतही चर्चा होणार आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं ह्रदय आहेत, कार्यकर्त्यांच ह्रदय आहेत. देशातून गांधी परिवाराला मोठी अपेक्षा आहे, आज किंवा उद्या देशात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल. 2024 मध्ये देशाच्या सत्तेत काँग्रेसच पाहायला मिळेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, एकीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी निकालानंतर नाराजी व्यक्त केली असून दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसकडून युपीतील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगत अभिनंदनाचा ठराव करण्याचे ठरवल्याचे याचीही सर्वत्र चर्चा होत आहे.  

नवज्योतसिंग सिद्धूंनीही दिला राजीनामा

सोनिया गांधींच्या आदेशानंतर गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी तत्काळ राजीनामा दिला, तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी निकालाच्या दिवशीच १० मार्चला राजीनामा देऊ केला होता. या राज्यांमध्ये नव्याने काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे. अजय कुमार लल्लू हे उत्तर प्रदेशचे तर एन. लोकेन सिंह हे मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 

प्रियंका गांधी यांनीही सोमवारी एक बैठक बाेलाविली हाेती. त्यात उत्तर प्रदेशातील पराभवानंतर अजय कुमार लल्लू यांना पक्षातील नेत्यांनी लक्ष्य केले. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील नेत्यांनी विराेध केला हाेता. त्याच प्रकारे पंजाबमध्येही चरणजीतसिंह चन्नी आणि सिद्धू यांच्यावरही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२