शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
5
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
6
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
7
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
8
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
9
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
10
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
12
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
13
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
14
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
15
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
16
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
17
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
18
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
19
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
20
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: निवडणुकीतील यशाबद्दल प्रियंका गांधींचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:56 IST

भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे.

मुंबई - देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तर प्रदेशातील यशाबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे. 

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत महाराष्ट्र आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत, हेच सांगायचं आहे. त्यासाठी, काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकारी आज होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशसारख्या खाली मैदानात मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवली. त्यामुळे, त्यांच्या कामाचं कौतूक करायचं आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या बैठकीत मांडायचा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

भाजपने कोणत्या रणनितीच्या आधारावर 4 राज्यात विजय मिळवला, याचे आत्मचिंतन करायचे आहे. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी चांगला स्कोप कशाप्रकारे मिळवता येईल, याबाबतही चर्चा होणार आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे काँग्रेसचं ह्रदय आहेत, कार्यकर्त्यांच ह्रदय आहेत. देशातून गांधी परिवाराला मोठी अपेक्षा आहे, आज किंवा उद्या देशात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल. 2024 मध्ये देशाच्या सत्तेत काँग्रेसच पाहायला मिळेल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, एकीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी निकालानंतर नाराजी व्यक्त केली असून दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसकडून युपीतील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे सांगत अभिनंदनाचा ठराव करण्याचे ठरवल्याचे याचीही सर्वत्र चर्चा होत आहे.  

नवज्योतसिंग सिद्धूंनीही दिला राजीनामा

सोनिया गांधींच्या आदेशानंतर गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी तत्काळ राजीनामा दिला, तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी निकालाच्या दिवशीच १० मार्चला राजीनामा देऊ केला होता. या राज्यांमध्ये नव्याने काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे. अजय कुमार लल्लू हे उत्तर प्रदेशचे तर एन. लोकेन सिंह हे मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 

प्रियंका गांधी यांनीही सोमवारी एक बैठक बाेलाविली हाेती. त्यात उत्तर प्रदेशातील पराभवानंतर अजय कुमार लल्लू यांना पक्षातील नेत्यांनी लक्ष्य केले. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील नेत्यांनी विराेध केला हाेता. त्याच प्रकारे पंजाबमध्येही चरणजीतसिंह चन्नी आणि सिद्धू यांच्यावरही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२