शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

न्यायाधीशपदासाठी १२३ शिफारशी पडून, कॉलेजियम व सरकारकडे नावे अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:51 AM

देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या एकूण १,०७९ मंजूर पदांपैकी ४०३ पदे रिकामी असताना १३ उच्च न्यायालायंमधील १२३ न्यायाधीश नेमण्यासाठी करण्यात आलेल्या नावांच्या शिफारशी केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम यांच्याकडे निर्णयाविना पडून आहेत.

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या एकूण १,०७९ मंजूर पदांपैकी ४०३ पदे रिकामी असताना १३ उच्च न्यायालायंमधील १२३ न्यायाधीश नेमण्यासाठी करण्यात आलेल्या नावांच्या शिफारशी केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम यांच्याकडे निर्णयाविना पडून आहेत.या आकडेवारीचा दुसरा अर्थ असा की, २८० रिकाम्या पदांसाठी उच्च न्यायालयांकडून नावेही सुचविण्यात आलेली नाहीत. प्रथेनुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडून संमती घेऊन न्यायाधीश नेनणुकीसाठी नावांची शिफारस प्रथम केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे पाठवितात. त्यांची इंटेलिजन्स ब्युरोकडून शहानिशा करून घेतल्यावर फाईल सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे पाठविली जाते.म्हणजेच उच्च न्यायालयांमधील रिकाम्या पदांपैकी निम्म्याहून अधिक पदे भरण्याची प्राथमिक पायरीही अद्याप ओलांडली गेलेली नाही. आणखी ३० टक्के जागांसाठी नावे सुचविण्यात आली आहेत, पण ती निर्णयाविना पडून आहेत.वरिष्ठ सरकारी सूत्रांकडून असे सांगम्यात आले की, विविध उच्च न्यायालयांनी पाठविलेल्या नावांपैकी ४३ नावांच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडे तर ८० नावांच्या शिफारशी केंद्र सरकारकडे पडून आहेत.न्यायाधीशांची सर्वाधिक पदे रिकामी असलेल्या उच्च न्यायालयांमध्ये अलाहाबाद (५६), कलकत्ता (३९), कर्नाटक (३८), पंजाब व हरियाणा (३७) आणि आंध्र प्रदेश-तेलंगण (३०) यांचा समावेश होतो.महिलांचे प्रमाणफक्त २८ टक्केसमाजजीवनाच्या इतर क्षेत्रांतमहिला पुरुषांच्या बरोबरीने कामगिरीबजावत असल्या तरी भारतात अजूनही न्यायाधीशपदांमध्ये पुरुषांचेच प्राबल्य दिसून येते. विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसीने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार देशभरातील न्यायाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण जेमतेम २७.८ टक्के आहे.या सर्वेक्षणाचे काही निष्कर्ष असेसर्वोच्च न्यायालयात २५ पैकी फक्त एक महिला न्यायाधीश.उच्च न्यायालयांमध्ये ६९२ न्यायाधीशांमध्ये ७० महिला.कनिष्ठ न्यायालायांत १५,८०६ पैकी ४,४०९ महिला.सर्वाधिक१० महिला न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयात.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय