शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 11:51 IST

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हैदराबाद - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करत तेलुगू नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. रविवारी हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी योगींनी सभा घेतली. त्यावेळी, तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार. तसेच हैदराबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी योगींनी एमआयएमसह काँग्रेस आणि टीआरएसलाही टार्गेट केलं.

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बेगम बझार या असुद्दुद्दीन ओवैसीच्या बालेकिल्ल्यातूनच योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणातील जनतेला संबोधित केले. योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्यानंतर, आणखी 25 शहरांच्या नाव बदलीचा प्रस्ताव भाजापाच्या विचारधीन असल्याचे समोर आले होते. तर, रविवारी पुन्हा एकदा हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे योगींनी म्हटले. तसेच हैदराबादमधून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यात येत आहे. येथील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असेही योगींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशात कुठेही दहशतवादी घटना घडल्यास त्याचे धागेदोरे हैदराबादमध्ये सापडतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गोशामहल मतदारसंघाचे भाजपा उमेदवार टी राजा यांनीही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे एका स्थानिक सभेत बोलताना म्हटले होते.      

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश