शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 11:51 IST

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

हैदराबाद - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करत तेलुगू नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. रविवारी हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी योगींनी सभा घेतली. त्यावेळी, तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार. तसेच हैदराबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी योगींनी एमआयएमसह काँग्रेस आणि टीआरएसलाही टार्गेट केलं.

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बेगम बझार या असुद्दुद्दीन ओवैसीच्या बालेकिल्ल्यातूनच योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणातील जनतेला संबोधित केले. योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्यानंतर, आणखी 25 शहरांच्या नाव बदलीचा प्रस्ताव भाजापाच्या विचारधीन असल्याचे समोर आले होते. तर, रविवारी पुन्हा एकदा हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे योगींनी म्हटले. तसेच हैदराबादमधून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यात येत आहे. येथील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असेही योगींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशात कुठेही दहशतवादी घटना घडल्यास त्याचे धागेदोरे हैदराबादमध्ये सापडतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गोशामहल मतदारसंघाचे भाजपा उमेदवार टी राजा यांनीही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे एका स्थानिक सभेत बोलताना म्हटले होते.      

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश