शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नालंदासारखे शिक्षण आता एकाच संस्थेत, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:44 IST

विद्यापीठांसह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या जमीन नियम अहवालात यूजीसीने आपला दृष्टिकोन जाहीर केला असून २०४० पर्यंत देशातील सर्व संस्था बहुविद्याशाखीय केल्या जातील. 

नवी दिल्ली : देशातील तक्षशिला आणि नालंदासारखी उच्च शिक्षण व्यवस्था पुन्हा उभारण्यात येणार आहे. या प्राचीन विद्यापीठांना आदर्श घेऊन, यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) देशातील उच्च शिक्षण संस्थांना बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रूपांतरित करणार असून, तिथे एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता येणार आहे. या संदर्भात, विद्यापीठांसह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या जमीन नियम अहवालात यूजीसीने आपला दृष्टिकोन जाहीर केला असून २०४० पर्यंत देशातील सर्व संस्था बहुविद्याशाखीय केल्या जातील. 

प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण संस्था

उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उच्च शिक्षण संस्था असेल. यामध्ये स्थानिक किंवा दोन भाषांमध्ये बहुविद्याशाखीय शिक्षण दिले जाईल.

नवीन शिक्षण धोरणांतर्गत, २०१८ च्या तुलनेत २०३५ पर्यंत नोंदणी ५० टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

२० एकरवर विद्यापीठ

विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्था चालवण्यासाठी अहवालात जमिनीचे मापदंडदेखील नमूद केले आहेत.विद्यापीठांसाठी आता देशभरात ३० एकर जमिनींऐवजी २० एकर जमीन पुरेशी असेल. तर महानगरांमध्ये १० एकर जमिनीची गरज असेल.

अहवालात काय? 

अहवालात असे म्हटले आहे की, भारत आणि जगातील हजारो विद्यार्थी तक्षशिला, नालंदा, वल्लभी आणि विक्रमशीला येथे बहुविद्याशाखीय वातावरणात शिक्षण घेत होते. हे शिक्षण आज इतर देशांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या बदलत आहे. 

नावीन्यपूर्ण आणि सुसंस्कृत व्यक्ती निर्माण करण्यासाठी भारतालाही या परंपरेकडे परतण्याची गरज आहे. म्हणूनच, २०४० पर्यंत देशातील संस्था बहुविद्याशाखीय बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय