शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 12:53 IST

स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

भारत-पाकिस्तान यांच्या तणावात नागपूरमधील ३६ वर्षीय महिला सुनीता काश्मीरच्या कारगिलमधून एलओसी रेषा पार करून पाकिस्तानात पोहचली आहे. या घटनेने भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थाही हैराण आहे. पाकिस्तानातील एका पादरीला भेटण्यासाठी सुनीताने हे धाडस केले. पादरीसोबत सुनीताची ऑनलाईन ओळख झाली होती. याआधीही तिने दोनदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिसऱ्या प्रयत्नात ती पाकिस्तानात पोहचली. याआधी दोन वेळा अटारी बॉर्डरवर तिला थांबवण्यात आले होते.

मंगळवारी सुनीताने तिच्या मुलाला कारगिलच्या सीमाभागातील हंदरमाण येथे एकटे सोडून एलओसी पार केली. मी लवकर येईन असं तिने मुलाला सांगितले परंतु उशीर झाला तरी ती न परतल्याने स्थानिकांनी लडाख पोलिसांना ही घटना कळवत मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले. भारतीय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सीमेपलीकडे तिला पकडल्याची पुष्टी केली नाही. परंतु टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सुनीताला पाकिस्तानच्या गावात पाहिले, त्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणेने तिला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. सुनीता पाकिस्तानी तपास यंत्रणेच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

तर सुनीता मानसिक रुग्ण आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. याआधीही सुनीताने दोन वेळा भारताची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मार्चमध्ये अमृतसर पोलिसांनी सुनीता आणि तिच्या मुलाला अटारी बॉर्डरवर पकडले. कुठल्याही कागदपत्राविना ती पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती असं तिच्या कुटुंबाने सांगितले. ही महिला प्रत्यक्षात पाकिस्तानात पोहचली होती. तपासात २०२० मध्ये तिचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून ती आणि मुलगा वेगळे राहत असल्याचे समोर आले असं कारगिलमधील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नेमकी घटना काय?

नागपूरची एक ३६ वर्षीय महिला आपल्या १५ वर्षांच्या मुलासह कारगिलमध्ये आली होती. मुलाला हॉटेलमध्ये एकटे सोडून ती गावात गेली आणि परतलीच नाही. ही घटना १४ मे रोजी घडली. ही महिला ९ मे रोजी आपल्या मुलासह एका हॉटेलमध्ये थांबली होती. १४ मे रोजी ती हंदरमाण गावात गेली, पण परतली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली.पोलिसांनी मुलाची चौकशी केल्यावर कळले की ते दोघं पंजाबमधून प्रवास करत कारगिलला आले होते. महिला तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी राहत होती. तीने यापूर्वी नागपूर आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केले आणि आता ती टेलरिंगचा व्यवसाय करत होती.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान